नाट्य परिषदेत `सीआयडी`चा प्रयोग
अखिल भारतीय नाट्य परिषद निवडणुकीतल्या बोगस मतपत्रिका प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी पुढे आली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात आपलं पॅनल उतरवणारे ज्येष्ठ रंगकर्मी विनय आपटे यांनी ही मागणी केली.
९०टक्के बोगस मतदान मोहन जोशी पॅनलला
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या बोगस मतदानातील सुमारे ९०टक्के मते मोहन जोशी पॅनलच्या उमेदवारांच्या पारड्यात पडलीयेत. ही धक्कादायक माहिती पोलीस सुत्रांकडून आलीये.
पुण्यातही नाट्य परिषद निवडणूक रद्द करण्याची मागणी
नाट्य परिषदेची मुंबई विभागाची निवडणूक रद्द झाल्यानंतर आता पुणे विभागातही निवडणूक रद्द करण्याची मागणी होऊ लागली आहे. मुंबई विभागाच्या निवडणूक वादावर पडदा पडत नाही तोपर्यंत पुण्यात हा नवा अंक सुरु झाला आहे. पुणे निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप पराभूत झालेल्या उमेदवारांनी केला आहे.
नाट्य परिषद निवडणुकीत बोगस मतदान
अखिल भारतीय नाट्य़ परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत बोगस मतदान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मतदार कमी आणि मतदान जास्त झाल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे मतमोजणी रोखण्यात आली. फेरमतदानाची मागणी करण्यात आली असून निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आलीय.
शिवाजी पार्कवर कडेकोट पोलीस बंदोबस्त
अखिल भारतीय नाट्य़ परिषदेच्या निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणची व्यवस्था पाहिल्यास, एखाद्या राजकीय निवडणुकीलाही लाजवेल असा कडेकोट पोलीस बंदोबस्त या परिसरात लागू करण्यात आलाय. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यानं अनेक पोलिसांना या परिसरात तैनात केलय.
`अभामनाप` निवडणूक मतदान आकडेवारीवरून वाद
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेतील निवडणुकीत मतदानाच्या आकडेवारीवरुनही वाद झालाय. साडेचार हजारांपेक्षा अधिक मतदान झालंच कसं ? असा सवाल नटराज पॅनलचे विनय आपटे यांनी केलाय.
नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा वाद पोलीस स्टेशनात!
अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वाद पोलिसात गेलाय. विनय आपटेंनी यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांची भेट घेतलीय. नाट्य परिषद निवडणुकीतील मतपत्रिका घोळा संदर्भात माहिती देण्यासाठी विनय आपटे यांनी ही भेट घेतली.
`मोहन प्यारे` पुन्हा जागा झाला
ज्या नाटकाने सिद्धार्थ जाधव याला एक ओळख दिली ते नाटक म्हणजे ‘जागो मोहन प्यारे’. तब्बल दीड वर्षानं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं.. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकाच दिवशी तीन प्रयोग करत सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या टीमने जोरदार पुनरागमन केल.
`आधुनिक एकच प्याला`
नांदीचे सूर कानी आले की पडदा वर जाणार आणि एक झक्कास नाटक पहायला मिळणार हे ओघानंच आलं.....
विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा मोहन जोशींचा आरोप
नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरून वाद सुरू झाले आहेत. माजी अध्यक्ष मोहन जोशी यांनी विनय आपटेंवर गंभीर आरोप केले आहेत. विनय आपटेंनी बोगस मतपत्रिका छापल्याचा आरोप मोहन जोशींनी केला आहे.
स्मिता तळवलकरांचं रंगभूमीवर पुनरागमन
कौशिक निर्मित विजय केंकरे दिग्दर्शित ‘दुर्गाबाई जरा जपून’ हे नाटक नुकतंच रंगमंचावर आलंय...अशोक पाटोळे लिखित या नाटकातून स्मिता तळवलकर यांनी ब-याच वर्षांनी रंगभूमीवर पुनरागमन केलंय...
प्रशांत सादर करतोय विश्वविक्रमी प्रयोग!
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणाऱ्या आणि अनेक रेकॉर्ड आपल्या नावे करणारा प्रशांत आज विश्वविक्रमी प्रयोग सादर करणार आहे.
अक्षय, आनंद यांना मराठी कलाकारांची श्रद्धांजली
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा, पत्नी आणि गाडीचा ड्रायव्हर हे प्रवास करीत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. या अपघातात स्वत: आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षाचा मुलगा यांचा मृत्यू झाला.
दादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.
टागोर तुच्छ दर्जाचे नाटककार - कर्नाड
‘रवींद्रनाथ टागोर हे एक महान कवी होते परंतू ते तुच्छ दर्जाचे नाटककार होते. त्यांच्या समकालीन बंगाली थिएटर्सनं त्यांच्या नाटकांना कधीच स्वीकारलं नाही’असंही कर्नाड यांनी म्हटलंय.
अमिताभ, माधुरीच कशाला हवेत?- अमोल पालेकर
बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनात अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित हे प्रमुख पाहुणे म्हणून कशाला हवेत, असा सवाल केलाय ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी.
डॉ. मोहन आगाशे मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष
९३ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर मोहन आगाशे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बारामतीत होणाऱ्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
प्रशांत -कविताची धमाल जोडी ९ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर
प्रशांत दामले आणि कविता लाड ही जोडी ९ वर्षानंतर रंगभूमीवर एकत्र येतेय. प्रशांत दामले आणि कविता लाड यांची ही धम्माल कॉमेडी पुन्हा एकदा रंगमंचावर आपल्याला अनुभवता येणार आहे. ‘माझिया भावोजींना रित कळेना’ या नाटकातून रंगमंचावर सुपरहिट ठरलेली ही जोडी जवळपास ९ वर्षानंतर पुन्हा एकत्र येतेय.
`एक चावट संध्याकाळ` महिलांनी पण पाहिलं
एक चावट संध्याकाळ या वादातीत नाटकाचा प्रयोग याआधी फक्त पुरुषांसाठी होत होता.पण नाटकाच्या २५ व्या प्रयोगाला महिलांनाही हा प्रयोग पाहण्याची संधी मिळाली.
`टॉम आणि जेरी` आता मराठीत?
एखादं नाटकं करायचं म्हटलं की अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं...मात्र नाटकाच्या पहिल्या प्रयोगालाच प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला की जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.