'या' कारणामुळे जान्हवी होती नाराज, श्रीदेवीसोबत ३ दिवस बोलणं केलं होतं बंद

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 25, 2018, 05:48 PM IST
'या' कारणामुळे जान्हवी होती नाराज, श्रीदेवीसोबत ३ दिवस बोलणं केलं होतं बंद title=

नवी दिल्ली : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत निधन झालं. कार्डिअॅक अरेस्टने वयाच्या ५४व्या वर्षी अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झालं.

बॉलिवूडसोबतच प्रेक्षकांना धक्का

श्रीदेवी यांच्या निधनाने बॉलिवूडसोबतच देशभरातील चाहत्यांनाही एकच धक्का बसला. श्रीदेवी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सिनेमांत भूमिका केली. आपल्या शेवटच्या 'मॉम' सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान श्रीदेवी यांनी आपल्या करिअरशी संबंधित एक किस्सा ऐकवला. पाहूयात काय घडलं होतं नेमकं...

प्रेक्षकांची मनं जिंकली मात्र...

श्रीदेवीने जवळपास ३०० सिनेमांत भूमिका केली आहे. भले ही श्रीदेवीने आपल्या अभिनयाच्या आणि नृत्याच्या जोरावर सर्वांची मनं जिंकली असतील. मात्र, एक सिनेमा असा होता जो पाहिल्यानंतर श्रीदेवीचीच मुलगी नाराज झाली होती.

मुलाखतीत सांगितला होता किस्सा

अभिनेत्री श्रीदेवी यांनी 'सदमा' या सिनेमात कमल हसन सोबत काम केलं. या सिनेमाशी संबंधित घडलेली घटना श्रीदेवी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितली होती.

'तु खूपच वाईट आहेस'

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवी यांनी सांगितलं होतं की, माझी मुलगी जान्हवी सहा वर्षांची होती त्यावेळी तिने 'सदमा' सिनेमा पाहिला होता. हा सिनेमा पाहिल्यानंतर जान्हवी माझ्यासोबत ३ दिवस बोलत नव्हती. जान्हवीने श्रीदेवीला म्हटलं की, "तु खूप वाईट आई आहेस आणि तु त्यांच्या (कमल हसन) सोबत चांगल नाही केलसं."

'सदमा' या सिनेमात श्रीदेवी कमल हसनला सोडून देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहिल्यानंतर जान्हवी खूपच नाराज झाली होती.