हृतिक आणि सुझानबद्दल संजय खान यांना काय वाटतं?

काय आहे हा प्रकार? 

हृतिक आणि सुझानबद्दल संजय खान यांना काय वाटतं? title=

मुंबई : बॉलिवूडमधील परफेक्ट कपलबद्दल बोलायचं झालं तर शाहरूख - गौरीनंतर हृतिक आणि सुझानचा नंबर लागतो. दोघं एकेकाळी बॉलिवूडमधील बेस्ट कपल होते. पण आता त्यांच्यात असं अचानक काही तरी झालं ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. 2014 मध्ये या दोघांनी एकमताने घटस्फोट घेतला आहे. 

मात्र घटस्फोटानंतरही हे दोघे फक्त मुलांसाठी एकत्र दिसले आहे. अनेकदा मुलांना घेऊन सुट्यांवर जाताना आपण यांना पाहिलं आहे. हे दोघं कधी मुव्ही डेट आणि डिनर डेटवर गेलेले देखील आपण पाहिले आहेत. आता अशी देखील बातमी आली होती की, हे दोघे पु्न्हा एकत्र येऊन लग्न करू शकतात. यावर आता सुझान खानच्या वडिलांचा म्हणजे संजय खान यांचं वक्तव्य समोर आलं आहे. 

संजय खान यांच म्हणणं आहे की, माझी इच्छा आहे की, या दोघांनी पुन्हा एकदा एकत्र यावं. याचा अर्थ असा आहे की, या दोन्ही कुटुंबात असं काही झालं नाही ज्यामुळे ही दोन्ही कुटुंब एकमेकांपासून लांब होतील. संजय खान यांनी नुकतीच आपली आत्मकथा लाँच केली आहे. ज्याचं नाव आहे 'द मिस्टेक्स ऑफ माय लाइफ'.

हृतिक आणि सुझान यांच्यात दरी पडण्यामागचं कारण कंगना रानावौत हे कारण आहे. कंगनाने जेव्हा मीडियात हृतिकचे मेल्स लीक करायला सुरूवात केली तेव्हा सुझान स्वतः हृतिकच्या समर्थनात समोर आली. एवढंच नाही तर 14 वर्षांच हे नातं सुझान आणि अर्जुन रामपाल यांच्या अफेअरमुळे सुझान आणि हृतिकच्या नात्यात दरी निर्माण झाली.