विराट - अनुष्काला दुसऱ्यांदा करावं लागणार लग्न, क्लिक करून जाणून घ्या कारण

दैनिक जागरणमध्ये दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्काच्या लग्नामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 8, 2018, 04:01 PM IST
विराट - अनुष्काला दुसऱ्यांदा करावं लागणार लग्न, क्लिक करून जाणून घ्या कारण  title=

मुंबई : दैनिक जागरणमध्ये दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्काच्या लग्नामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. 

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने 11 डिसेंबर रोजी बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्यासोबत इटलीच्या टस्कनी शहरातील बोरगो फिनोसिएतो रिसॉर्टमध्ये लग्न केलं. मात्र रोममध्ये असलेल्या भारतीय दुतावासाला याची कोणतीच माहिती नव्हती. यामुळे आता यांच्या लग्नात अडचणी येण्याच्या दाट शक्यता आहेत.

यासाठी करावं लागणार दुसऱ्यांदा लग्न

नियमानुसार भारतीय व्यक्ती दुसऱ्या देशात लग्न करत असेल तर विदेशी विवाह अधिनियम 1969 च्या अंतर्गत ते लग्न रजिस्टर्ड केलं जातं. आणि विरूष्काचं लग्न त्या पद्धतीने झालेलं नाही. त्यामुळे आता हे दोघं ज्या देशात राहतात त्या नियमांप्रमाणे आपलं लग्न रजिस्टर्ड करावं लागेल. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा भारतात लग्न  करावं लागणार आहे. 

आता हे लग्न कायद्याच्या दृष्टीकोनातून अवैध नाही आहे. त्यामुळे आता विराट आणि अनुष्काला लग्न कायदेशीररित्या खरे ठरवण्यासाठी रजिस्टर्ड लग्न कराव लागणार आहे. ही बातमी अंबालातील एका वकिलाने आरटीआयवर आधारित सांगितलं आहे. या बातमीत असा दावा केला आहे की, या वकिलाला रोममधील भारतीय दूतावासाकडून असं उत्तर मिळालं आहे की, विरूष्काच्या लग्नाची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नव्हती.