'आमिरसोबत काम करण सर्वात मोठी चूक'

एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील मोठी चूक असल्याचे तिने सांगितले.

Updated: Apr 22, 2018, 12:21 PM IST
'आमिरसोबत काम करण सर्वात मोठी चूक'  title=

मुंबई : मोठमोठ्या स्टारकास्ट सोबत काम करायला मिळण हे नवोदित अभिनेते-अभिनेत्री आपलं भाग्य समजतात. दिग्गजांसोबत काम करण्यासाठी नानातऱ्हेने प्रयत्न करत असतात. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सनाया हिरानीला मात्र मोठ्या सिनेमात काम करण ही सर्वात मोठी चूक वाटतेय. त्यामागच कारणही तसच आहे. सनायाने आमिर आणि काजोलच्या फना या सिनेमात छोटा रोल केला होता. एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील मोठी चूक असल्याचे तिने सांगितले. हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले, 'फना' मधून बॉलीवूड एन्ट्री करण माझ्यासाठी चांगल नव्हत. मला ही भूमिका नाही करायला पाहिजे होती. ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. सिनेमात माझा खूप छोटा रोल होता. त्यामूळे दर्शकांसमोर याचा जास्त प्रभाव राहिले नाही.

तो निर्णयही चुकला 

 

So happy to see these across Goa! My favourite @whiteowlbrewery 

A post shared by Sanaya (@sanayairani) on

त्यानंतर मला २-३ सिनेमात काम करण्याच्या ऑफर मिळाल्या पण त्यादेखील छोट्या भूमिका असल्याने मी नाकारल्या पण ही देखील माझी मोठी चूक होती.

 

Good times ya good times 

A post shared by Sanaya (@sanayairani) on

कारण ते सिनेमा नंतर हिट ठरले.' टीव्ही ससिरियलमध्ये तरुण प्राधान्य भूमिका केल्याचा फायदा झाल्याचे तिने सांगितले. मला योग्यवेळी योग्य शो मिळाले, याबाबतीत मी भाग्यशाली असल्याचेही ती म्हणते. सनाया ही लोकप्रिय शो 'राइट लेफ्ट', 'मिले जब हम-तुम' आणि 'इस प्यार को मै क्या नाम दू' मध्ये काम केलयं.