मुलींना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी

गर्लफ्रेंडला किंवा बायकोला कसे खुश करावे हा आपल्यापैकी अनेकांना सतावणारा अवघड प्रश्न. कारण, स्त्रीचा मुड नियमीतपणे सांभांळने ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. 

Updated: Nov 10, 2018, 09:34 PM IST
मुलींना आवडणाऱ्या मुलांच्या गोष्टी title=

मुंबई : गर्लफ्रेंडला किंवा बायकोला कसे खुश करावे हा आपल्यापैकी अनेकांना सतावणारा अवघड प्रश्न. कारण, स्त्रीचा मुड नियमीतपणे सांभांळने ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. सकाळी खूष असलेली तुमची ‘लाडकी’ दूपारी कशामुळे ‘अपसेट’ होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच या छोट्याशाच पण ‘स्मार्ट’ गोष्टी लक्षात ठेवाल तर ‘ती’चा मूड फ्रेश राखने तुम्हाला अधिक सोपे जाईल.

१ ) तु खूपच सुंदर आहेस –

सुंदर कपडे, सुंदर ठिकाणी खाणे पिणे आणि खूप खूप कौतूक या ३ गोष्टी मुलींना खूप आवडतात. या तिन गोष्टींशीवाय मूली फार काळ शांत राहणे कठीण आहे. म्हणूनच तुम्ही जर मुलींच्या ड्रेसची, तिने बनविलेल्या पदार्थाची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिच्या लुक्सचे तुम्ही जर कौतूक कराल तर तुम्ही अर्धी लढाई जिंकली म्हणून समजा. मुली, महिला स्वत:ही हे मान्य करतात की त्यांना कुणी त्यांचे कौतुक केलेले आवडते.

२ ) आय लव्ह यू –

हे तीन शब्द तुम्ही भलेही अनेक वेळा वापरले असतील. पण, हेच शब्द तुम्ही योग्य वेळी वापरा. तिच्यासमोर अनेपेक्षितपणे या शब्दाचा वापर करून तुम्ही तिला चकीत केले, तर ती तुमच्यावर फिदा झालीच म्हणून समजा. कारण ‘आय लव्ह यू’ या शब्दाचा मुलींना कधीच कंटाळा येत नाही.

५ – तू माझ्या आयुष्यातील पहिली स्त्री आहेस –
तुमच्या या वाक्यामुळे तुम्ही तिच्या हृदयात घर करता. कारण, तुमच्याबद्धल तिच्या मनात विश्वास निर्माण होतो की, तुमच्या आयुष्यात ती एकटीच आहे. पण लक्षात ठेवा हे वाक्य जर खरे असेल तरच बोला.

स्त्रिया या प्रचंड चाणाक्ष असतात. त्यांना आपला नवरा / बॉयफ्रेंड दुसरीच्या नादी लागला आहे. हे तुम्ही स्वत:हून सांगण्याची गरज नसते. ते ओळखण्याची क्षमता उपजतच त्यांच्यात असते. त्यामुळे तुम्ही खोटे बोलाल तर प्रकरण अंगाशी येण्याची शक्यता असते.

४ )तू माझी मैत्रिण आहेस –

दोघांमधील भांडणाचा शेवट करण्यासाठी हे वाक्य अत्यंत फायदेशीर ठरते. कोणत्याही स्त्रीला ईतर कोणत्याही नात्यापेक्षा मैत्रिचे नाते जास्त मोकळेपणाचे आणि सोईचे वाटते. मैत्रिपेक्षा ईतर कोणत्याही नात्यात बंधने येतात. जबाबदारीचे भान ठेवावे लागते. मात्र, मैत्री हे असे नाते आहे, की तुमचे गुणदोषही स्विकारले जातात. या नात्यात तूमच्या गुणांचे कौतूक केले जाते आणि तितक्याच प्रेमाणे तुमच्या चुकाही सांगितल्या जातात.

५ ) मी नशिबवान आहे, कारण तू माझ्या आयुष्यात आलीस –

बस हे एक वाक्य तिचा गेलेला मुड परत आणण्यासाठी पुरेसे आहे. वास्तवात परिस्थीती काहीही असली तरी तुम्ही ज्या वेळी हे वाक्य बोलता त्या वेळी तुम्ही तिचे झालेले असता. तूमच्या या वाक्यावर ती फिदा होते. कारण, ती तूमच्यासाठी किती महत्त्वचा आहे हे या वाक्यातू तिच्यापर्यंत पोहोचलेले असते.

लक्षात ठेवा….

वरील सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक वाचल्या असतील तर हेही लक्षात ठेवा की, तुम्ही तिच्याशी बोलताना तूमच्या आवाजाची पातळी (टोन) कसा आहे. तूमच्या टोनवर बरेच काही अवलंबून असते. असे म्हटले जाते की जगभरातील १०० पैकी ६० टक्के भांडणे ही चुकीच्या टोणमुळे होतात. तेव्हा तूम्हीही सावधान…