केस धुताना तुम्हीपण या चुका करता का ? अशी घ्या काळजी

आंघोळ करतानाच आपण अनेक चुका करतो त्या टाळल्या तर आपले केसही मजबूत राहू शकतात. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Nov 10, 2017, 09:19 PM IST
केस धुताना तुम्हीपण या चुका करता का ? अशी घ्या काळजी title=

मुंबई : केसात कोंडात, केस गळणे, टक्कल पडणे ही तुमचीपण समस्या आहे का ?   यातून मार्ग निघण्यासाठी तुम्हीही आतापर्यंत खूप पैसे खर्च केले आहेत का ? टि.व्हीवरील जाहिरातींना भुलून तुम्हीही वेगवेगळे शाम्पू केसांवर ट्राय करुन कंटाळले आहात का ? तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकते. कारण आंघोळ करतानाच आपण अनेक चुका करतो त्या टाळल्या तर आपले केसही मजबूत राहू शकतात. 

गरम पाणी

 केस धूताना गरम पाण्याचा वापर करणे केसांच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. अनेकांना आंघोळीसाठी कडकडीत पाणी घेण्याची सवय असते. या कडकडीत पाण्याने  केस कोरडे होऊन तुटण्याची शक्यता जास्त असते. 

साबणाचा वापर 

साबणामध्ये केमिकल्स असल्याने केस धुण्यासाठी साबणाचा वापर करणे टाळायलाच हवे.

कोणता शाम्पू ?

 जास्त किंमतीतला शाम्पू म्हणजे केसांची सुरक्षा हे समीकरण आपल्या डोक्यात असते जे फारच चुकीचे आहे. सर्वच शाम्पू आपल्या केसांना सूट होत नाहीत. त्यामूळे तज्ञांचा सल्ला घेणे नेहमी योग्यच ठरते.

अशी घ्या काळजी 

केसातील कोंडा दूर करण्यासाठी केसांना धुण्याआधी मध आणि दही यांचे मिश्रण लावल्यास लाभदायी ठरते.
 
केस धुण्याआधी केसांना दही आणि अंड्याचे मिश्रण लावल्यास केसांच्या आरोग्यासाठी चांगले ठरते. 

केसगळती थांबण्यासाठी एरंडेल, ऑलिव्ह किंवा बदाम यापैकी कोणत्याही दोन तेलांचे मिश्रण करून त्यामध्ये ‘ई’ व्हिटॅमिनची कॅप्सूल उपयोगी ठरते. या मिश्रणाने केसांना पोषण मिळते तसेच केसगळती रोखण्यास मदत होते.