काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये रविवारी झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय सैन्याने चार दहशतवाद्यांना जिवंत पकडले. अल बद्र या दहशतवादी संघटनेत नव्याने दाखल झालेले हे दहशतवादी सीमेवरुन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. 

Updated: Aug 26, 2018, 10:32 PM IST
काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात यश title=

श्रीनगर: कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडामध्ये रविवारी झालेल्या चकमकीदरम्यान भारतीय सैन्याने चार दहशतवाद्यांना जिवंत पकडले. अल बद्र या दहशतवादी संघटनेत नव्याने दाखल झालेले हे दहशतवादी सीमेवरुन घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. 

हंदवाडा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय जवानांना मिळाली होती. यानंतर भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी या दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी सापळा रचला.  जवानांनी घेरले हे लक्षात येताच दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. 

दहशतवादी आणि जवान यांच्यात जोरदार धुमश्चक्री झाली. दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण करावे अशा सूचना मिळाल्यानंतर चारही दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले. तर अन्य तीन दहशतवादी फरार झालेत. या चार दहशतवाद्यांकडून  शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.