लग्नाचं वऱ्हाड नेणा-या ट्रकला भीषण अपघात, २५ ठार

लग्नाचं वऱ्हाड घेऊन जात असलेल्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. हा ट्रक पुलावरून थेट नाल्यात कोसळला. या भीषण अपघातात २५ जण ठार झाले. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 

Updated: Mar 6, 2018, 11:44 AM IST
लग्नाचं वऱ्हाड नेणा-या ट्रकला भीषण अपघात, २५ ठार title=

भावनगर : लग्नाचं वऱ्हाड घेऊन जात असलेल्या ट्रकचा भीषण अपघात झालाय. हा ट्रक पुलावरून थेट नाल्यात कोसळला. या भीषण अपघातात २५ जण ठार झाले. मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 

गुजरातमधील राजकोट-भावनगर राज्य महामार्गावर उमरालाजवळ आज सकाळी हा अपघात झाला. लग्नाचं वऱ्हाड घेऊन हा ट्रक राजकोट-भावनगर महामार्गावरून निघाला होता. या ट्रकमध्ये जवळपास ६० वऱ्हाडी होते. समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या नादात ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरून नाल्यात कोसळला. या अपघातात २५ वऱ्हाडी ठार झाले आहेत. तर ३५ जण जखमी झाले आहेत. 

प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातात २५ जण ठार झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातातील जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.