लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीला जिवंत जाळले...

लग्नाला होकार दिला नाही म्हणून महिलेला जिवंत जाळण्याची घटना राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात घडली.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 25, 2017, 06:54 PM IST
लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीला जिवंत जाळले...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

राजस्थान : लग्नाला होकार दिला नाही म्हणून महिलेला जिवंत जाळण्याची घटना राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यात घडली. प्रियकराचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला म्हणून प्रियकराने आणि त्याच्या वडिलांनी तिला जाळले. सीमा यादव असे या महिलेचे नाव आहे. तिच्यावर  उदयपूरच्या रूग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी सीमाचा प्रियकर रवी यादव, त्याचे वडिल चंदू यादव आणि आई गंगा यादव या तिघांनाही अटक करण्यात केली आहे. 

या तिघांनी मला रस्त्यावर मारहाण केली. तसेच आपल्या अंगावर रॉकेल ओतले आणि पेटवून दिले, असा कबुली जबाब पिडीत महिलेने दिला. त्यानंतर कारवाई करण्यात आली. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील वृत्त दिले आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या तिघांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणात गुन्हाही नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सध्या सीमाची प्रकृती चिंताजनक असून, ती जगेल की नाही हे देखील सांगता येत नाही असेही एएनआयने त्यांच्या बातमी म्हटले आहे.

रविवारी रात्री उशिरा ही धक्कादायक घटना घडली. फक्त लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने महिलेला जाळण्यात आले. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशातील महिला असुरक्षितता अशा घटनांमधून वारंवार अधोरेखित होते. दरम्यान, आरोपींना कठोर शासन व्हावे अशी मागणी सीमा यादवच्या कुटुंबाने पोलिसांकडे केली आहे.