रत्नागिरीत जुगार खेळणाऱ्या ४१ जणांना अटक

जाकादेवी परिसरात पिठोरी अमवस्येला जुगार खेळायला बसलेल्या ४१ जणांना रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

Updated: Aug 22, 2017, 07:44 PM IST
 title=

रत्नागिरी : जाकादेवी परिसरात पिठोरी अमवस्येला जुगार खेळायला बसलेल्या ४१ जणांना रत्नागिरी गुन्हे अन्वेषण शाखा आणि ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

काल पिठोरी अमवस्येला रात्र जागण्याची परंपरा आहे मात्र ही रात्र जागवत असताना मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तालुक्यातील जाकादेवी येथील एका घरात सापळा लावण्यात आला होता त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

तब्बल ४१ जण तीन पत्ती जुगार खेळताना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून २ लाख ८० हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय आणि या उत्सवात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो या जुगाराला आळा बसावा यासाठी सध्या रत्नागिरी पोलिसांनी कंबर कसली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे अनेक बडे जुगा-यांचे धाबे दणाणले आहेत.