वाघाची शेळी, ससा नाही तर कासव झालंय; अजितदादांचा वार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असलेली वाघाची शिवसेना आता राहिली नसून त्याची शेळी, ससा नाही तर कासव झाल्याची टीका अजित पवारांनी केलीय. 

Updated: Jan 25, 2018, 12:41 PM IST
वाघाची शेळी, ससा नाही तर कासव झालंय; अजितदादांचा वार title=

जालना : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात असलेली वाघाची शिवसेना आता राहिली नसून त्याची शेळी, ससा नाही तर कासव झाल्याची टीका अजित पवारांनी केलीय. 

जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद इथं राष्ट्रवादीच्या वतीने हल्लाबोल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. या सभेत त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलंय.

शिवसेनेने तीन वर्षात शंभर वेळा सरकारमधून बाहेर पडण्याच्या धमक्या दिल्या. मात्र त्यामुळे ते कशाला सत्ता सोडतील असा सवाल पवारांनी केलाय. यावेळी अजित पवारांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंवरही टीकास्त्र सोडलंय.