३६ तास उलटून गेल्यानंतरही अणूस्कुरा बंद

बुधवारी रात्री अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती

Updated: Jul 13, 2018, 03:49 PM IST

रत्नागिरी : रत्नागिरी जवळचा अणूस्कुरा घाट ३६ तास उलटून गेल्यानंतरही बंद आहे. बुधवारी रात्री अणुस्कुरा घाटात दरड कोसळली होती. त्यानंतर दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे... सतत पडत असलेल्या पावसाने कामात अडचणी निर्माण होत आहेत.

या मार्गावरून जाणारी वाहतूक सध्या इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर कोसळलेली दरड पूर्णपणे बाजुला करण्यात आलेली नाही.