...तर खासदारकीचा राजीनामा देऊ, नाना पटोलेंचा भाजपला इशारा

 राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय.

Updated: Aug 20, 2017, 05:09 PM IST
...तर खासदारकीचा राजीनामा देऊ, नाना पटोलेंचा भाजपला इशारा title=

भंडारा : राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी आणि या कर्ज माफीनंतर ऑनलाईन पद्धतीत शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांच्या या अडचणीवरून भाजप खासदार नाना पटोले यांनी राजीनाम्याचा इशारा दिला आहे.  

राज्यातील शेतकऱ्यांची बाजू घेत सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी असे विधान या अगोदर भाजप खासदार नाना पटोले यांनी केले होते. त्यांचा या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे अजूनही सरकार जर ऐकत नसेल तर आपण आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊ अशी खडतर भूमिका त्यांनी घेतली आहे.

तसंच आपण ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी लाईन उभी करू अशी देखील त्यांनी आपली भूमिका मांडली आहे त्यामुळे सत्तेत असणाऱ्या भाजपाला पुन्हा एकदा घरचाच अहेर मिळाला आहे. नाना पटोले यांच्या या विधानावर पक्षश्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेवर भाजप काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.