'...तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती'

 तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती असा खळबळजनक दावा खटल्यातील प्रमुख साक्षीदारानं केलाय.

Updated: Aug 23, 2018, 11:01 AM IST

कोल्हापूर : डॉ  नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर एटीएसनं योग्य कारवाई केली असती, तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या झालीच नसती असा खळबळजनक दावा खटल्यातील प्रमुख साक्षीदारानं केलाय. कोल्हापुराच्या संजय साडवीलकरांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत हा दावा केलाय.

सनातनच्या हालचाली 

साडवीलकारांनी  दाभोलकरांच्या हत्येआधीच  साताऱ्याच्या जवळ  एका ढाब्यावर एटीएसच्या  अधिकाऱ्याला सनातनच्या हालचालींची सगळी माहिती दिल्याचा दावाही साडवीलकरांनी केलाय.. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत अधिकाऱ्याचं नाव सांगण्यात मात्र साडवीलकर असमर्थ ठरलेत.