मुंबई-गोवा म‍हामार्गावर भीषण अपघात, पाच जण ठार

मुंबई-गोवा म‍हामार्गावर पहाटे ५ वाजण्‍याच्‍या सुमारास दोन कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झालेत.

Updated: Mar 8, 2018, 08:19 PM IST
मुंबई-गोवा म‍हामार्गावर भीषण अपघात, पाच जण ठार  title=

रत्नागिरी : मुंबई-गोवा म‍हामार्गावर पहाटे ५ वाजण्‍याच्‍या सुमारास दोन कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जण ठार झालेत.

महामार्गावर लोणेरेजवळ उसरघर इथे मुंबईहून चिपळूणकडे जाणारा कंटेनर आणि मुंबईकडे येणारा दुसरा कंटेनर यांची समोरासमोर टक्‍कर झाली . याचवेळी एक स्‍कुटीही त्‍यांना जाऊन आदळली.  स्‍कुटीचालकासह दोन्‍ही कंटेनरमधले चार जण असे एकूण पाच जण ठार झाले. 

अपघातानंतर  दोन्‍ही कंटेनरला आग लागली आणि कंटेनरचे मोठं नुकसान झाले . पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेवून स्‍थानिकांच्‍या मदतीने आग विझवली. आणि वाहतूक सुरळीत केली. अपघातग्रस्‍त दोन्‍ही कंटेनर हे राजस्‍थान पासिंगचे असल्‍याची माहिती मिळाली आहे.