कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही -उद्धव ठाकरे

नाशिक जिल्ह्यातील येवल्यात उद्धव ठाकरे यांनी आज संवाद यात्रेला सुरूवात केली, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली.

Updated: Jun 25, 2017, 02:21 PM IST
कर्जमाफीचा निर्णय समाधानकारक नाही -उद्धव ठाकरे title=

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील येवल्यात उद्धव ठाकरे यांनी आज संवाद यात्रेला सुरूवात केली, यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. आता झालेली कर्जमाफी ही शिवसेनेमुळे झाली, मात्र ही कर्जमाफी देखील समाधानकारक नाही, सरकारच्या मानगुटीवर बसून आपण संपूर्ण कर्जमाफी घेणार असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी निक्षूण सांगितलं.

शिवसेनेच्या संवाद यात्रेला येवल्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे, याच येवल्यात कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. येवल्यातील आजच्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून ते कर्जमाफीच्या निर्णयावर समाधानी नसल्याचं दिसून येत आहे, आपण सरसकट कर्जमाफीसाठी आग्रही असल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.