पिकनिकसाठी आलेल्या तिघांचा खडवली नदीत मृत्यू

Updated: May 21, 2018, 10:01 PM IST

कल्याण : कल्याण परीसरातील टिटवाळा जवळच्या खडवली नदीत चौघांचा बुडून मृत्यू झालाय. पिकनिकसाठी रविवार चौघेजण आले होते. राजेश टमटा, सुरज सोनार, रोशन सिंग आणि त्यांचे मित्र खडवली नदीत पोहण्यासाठी आले होते.

पोहत असतांना रोशनला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. रोशन बुडत असतांना त्याचे मित्र राजेश आणि सुरज त्याला वाचवण्यासाठी गेले. मात्र, त्याला वाचवताना तिघांचाही खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला.

रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली होती. मात्र, त्या तिघांचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. शोधमोहिमेनंतर पोलीस आणि अग्निशमन दलाला या तीनही तरुणांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. 

हे तिघेही ठाण्याचे रहिवाशी आहे. तर दुसऱ्या एका घटनेत आपटी नदीत सुरेश मारवाडी यांचा बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.