मोदींनी केले मुख्यमंत्री आणि दानवेंचे कौतूक

महाराष्ट्र भाजपासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करुन कौतूक आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 10, 2017, 03:16 PM IST
मोदींनी केले मुख्यमंत्री आणि दानवेंचे कौतूक title=

मुंबई : महाराष्ट्र भाजपासाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीतल्या भाजपच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधानांनी ट्विट करुन कौतूक आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीतही भाजपाची सरशी झाल्याने शेतकरी, तरुण आणि गरीबांची विकासाच्या अजेंड्याला साथ असल्याचं स्पष्ट झाल्याचं मोदींनी म्हटले आहे.
त्यावर मुख्यमंत्र्यांनीही ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना धन्यवाद दिले आहेत.

 देशातल्या प्रत्येक माणसापर्यंत विकास पोहोचवण्याच्या तुमच्या ध्येयाचं आणि तुमच्या खंबीर नेतृत्वाचा आणि दूरदृष्टीचा हा विजय असल्याचं फडणवीसांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.