घराला लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू

 दिवा मुलांच्या हातातून खाली पडला आणि घरातल्या कपड्यांनी पेट घेतला.

Updated: Oct 1, 2018, 10:14 AM IST
घराला लागलेल्या आगीत दोन मुलांचा मृत्यू  title=

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातल्या साखरी नाटे गावातील एका घराला लागलेल्या आगीमुळे दोन लहान मुलांचा मृत्यू झालाय. नासीर दर्वेश आणि फातिमा दर्वेश अशी या मुलांची नावं आहेत. नाटे गावात गेल्या दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंड़ित होता. त्यामुळे मुलांचे वडील मुद्दसर दर्वेश यांनी घरात रॉकेलचा दिवा पेटवला. हा दिवा मुलांच्या हातातून खाली पडला आणि घरातल्या कपड्यांनी पेट घेतला.

आग नियंत्रणाबाहेर 

घरात मोठ्या प्रमाणात लाकडी सामान असल्यानं आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं.  धुरामुळे दोन्ही मुलं गुदरमली आणि त्यांना घराबाहेर न पडता आल्यानं त्यांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी मुलांचे आईवडील कामानिमित्त शेजारी गेले होते आग इतकी भयंकर होती की आजूबाजूला असणाऱ्या वस्तीतील लोकांना घराबाहेर काढण्यात आलं.