'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा'

'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा', अशी मागणी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केलीय. 

Updated: Feb 15, 2018, 07:21 PM IST
'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा'  title=

जालना : 'कर्जबुडव्यांची संपत्ती जप्त करून शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवा', अशी मागणी गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी केलीय. 

हिरे व्यापारी निरव मोदी आणि उद्योगपती विजय माल्या बँकांचे कोट्यावधी रुपये बुडवून पसार झाले आहेत. त्यांच्यावर काहीही कारवाई न करता बँका काही हजारांसाठी शेतकऱ्यांकडे वसुलीकरता तगादा लावतात. 

ही बाब गंभीर असून अशा बँकबुडव्या उद्योगपतींची संपत्ती जप्त करून, त्या रकमेतून शेतकऱ्यांना मदत केली जावी, अशी मागणी जालनामधल्या शेतकऱ्यांनी केली आहे.