ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात.

Updated: Oct 13, 2018, 08:47 PM IST
ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात title=

ठाणे : मुंब्रा-कळवासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूरमधील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे. 

यासाठी २१ ऑक्टोबरपासून आठवड्यातून एक पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. लघुपाटबंधारे विभागाने पाण्याच्या स्थितीबाबत बैठक घेऊन आठवड्यात २२ टक्के पाणी कपातीचे आदेश जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, एमआयडीसी आणि टेमघर या पाणी उचलणाऱ्या संस्थांना दिलेत.