'ते' लोक देशद्रोही : मुख्यमंत्री फडणवीस

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणारे लोक देशद्रोही असल्याची घणाघाती टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.

Updated: Aug 17, 2017, 07:04 PM IST
'ते' लोक देशद्रोही : मुख्यमंत्री फडणवीस title=

मुंबई : स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणारे लोक देशद्रोही असल्याची घणाघाती टीका आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.

शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या नेत्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू न देण्याचं आंदोलन केलं. त्यावर आज मुख्यमंत्र्यांनी जोरदार तोंडसुख घेतलं. भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी हे उद्गार काढले. 

समारोपाच्या भाषणात फडणवीसांनी नेतृत्व बदलाच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला.त्याचप्रमाणे सरकारनं घेतलेले चांगले निर्णय लोकांपर्यंत पोहचत नसल्याची खंतही व्यक्त केली.