मुंबई विद्यापीठानं चोळलं विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ

मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची थट्टा केली गेलीय. अकॅडमिक काउन्सिलमध्ये संजय देशमुखांच्या चक्क 'अभिनंदना'च्या ठरावावर चर्चा कण्यात आलीय.

Updated: Oct 12, 2017, 04:35 PM IST
मुंबई विद्यापीठानं चोळलं विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची थट्टा केली गेलीय. अकॅडमिक काउन्सिलमध्ये संजय देशमुखांच्या चक्क 'अभिनंदना'च्या ठरावावर चर्चा कण्यात आलीय.

ऑनलाईन असेसमेंटच्या निर्णयानंतर कुलपती विद्यासागर राव यांनी अजूनही कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना कामावर रुजू करुन घेतलेलं नाही तर त्यांना राजीनामा मागितल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलच्या सभासदांनी मात्र देशमुखांच्या अभिनंदनाविषयी चर्चा केलीय. मुंबई विद्यापीठाचं हे कृत्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचंच काम आहे, अशी चर्चा केली जातेय.

पाच महिने उलटले तरी पदवी परीक्षांचे सर्व निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. इतकचं काय तर शेकडो उत्तरपत्रिका आणि विद्यार्थ्यांची हजेरीपत्रकही विद्यापीठाकडून गहाळ झालंय. विद्यार्थ्यांचं संपूर्ण वर्ष वाया गेलंय. पण मुंबई विद्यापीठाला त्याची जाणिव नसल्याचंच विद्यापीठाच्या या कृतीतून दिसून येतंय. मुंबई विद्यापीठाकडूनच ही माहिती मिळाली असून विद्यार्थ्यांच्या संतप्त प्रतिक्रीया यावर उमटल्या आहेत.