विधानपरिषदेत चक्क सत्ताधाऱ्यांचा कामकाजावर बहिष्कार

पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 

Updated: Aug 3, 2017, 07:59 AM IST

मुंबई : पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. 

विधानपरिषदेच्या कामकाजाची संहिता तयार होत नाही तोपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका सत्ताधारी यांनी घेतली आहे. त्यामुळे वेळापत्रकात भरपूर कामकाज दाखवण्यात आले असले तरी विधानपरिषदमध्ये किती कामकाज होणार का यांवर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे. 

विरोधक एक पाऊल पुढे टाकत सत्ताधारी यांची समजूत घालतात का आक्रमक सत्ताधारी एक पाऊल मागे घेतात यावर परिषदमधील कोंडी फुटणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. परिषदचे कामकाज सुरू होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधक यांची बैठक अपेक्षित आहे. 

तर विधानपरिषदच्या अभूतपूर्व परिस्थितीचे पडसाद विधानसभेमध्ये नक्कीच उमटणार आहेत. विरोधक कामकाजात सहभागी होणार का, सत्ताधा-यांना कोंडीत कसे पकडणार यांवर विधानसभेतील कामकाज गाजणार आहे.