...आणि मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला दिल्या शुभेच्छा

Updated: May 24, 2018, 05:09 PM IST

मुंबई : विधानपरिषदेत शिवसेनेच्या विजयात ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांचे आभार, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषद निकालांवर प्रतिक्रिया दिलीय.

रत्नागिरीत शिवसेनेविरोधात सर्वजण एकवटले, शिवसेनेविरोधात मतदान करणे हा भाजपचा अधिकृत निर्णय होता की त्यांची मते फुटली हे मुख्यमंत्री जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. मतं फुटली असतील तर भाजपने चिंतन करावं, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय. 

दुसरीकडे नाशिकमधलं एकूण गणित जर बघितलं तर कुठल्या मतांवर शिवसेना निवडुन आली हे लक्षात येईल, शिवसेनेला शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिलीय.