धर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील

शेतकरी धर्मा पाटलांची आत्महत्या नसून हा सरकारनं केलेला खून आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2018, 08:17 PM IST
धर्मा पाटलांची आत्महत्या नसून सरकारनं केलेला खून - राधाकृष्ण विखे पाटील title=

मुंबई : शेतकरी धर्मा पाटलांची आत्महत्या नसून हा सरकारनं केलेला खून आहे असा घणाघाती आरोप विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकारनं शेतक-यांना कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही दोन हजार शेतक-यांनी राज्यात आत्महत्या केल्याचा आरोप विखेपाटील यांनी केला आहे. तर सरकारला सत्तेची मस्ती आली आहे असा निशाणा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी साधला आहे.

विरोधक वैफल्यग्रस्त मानसिकेतून टीका करत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सर्व शेतक-यांना कर्जमाफी मिळेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.