टीम इंडिया जिंकण्यासाठी धडपडतेय...

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहेत. आतापर्यंत भारताच्या ७ विकेट गेल्या आहेत. गेल्या काही मॅचमध्ये प्रमुख बॅट्समननी साफ निराशाच केली आहे.

Updated: Feb 21, 2012, 04:29 PM IST

www.24taas.com, ब्रिस्बेन

 

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वनडे मॅचमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन पुन्हा एकदा फ्लॉप ठरले आहेत. आतापर्यंत भारताच्या ७ विकेट गेल्या आहेत. गेल्या काही मॅचमध्ये प्रमुख बॅट्समननी साफ निराशाच केली आहे. आजच्या मॅचमध्येही भारतीय बॅट्समन फारशी चमकदार कामगिरी करू शकले नाही. विराट कोहली चांगली खेळी केली. त्याने ६६ रनपर्यंत मजल मारली. पण त्याला मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही.

 

लाईव्ह स्कोअर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

 

कोहली आऊट झाल्यानंतर, रविंद्र ज़डेजा, आणि पार्थिव पटेल हे सुद्धा लगेचच तंबूत परतले. भारताला जिकंण्यासाठी ५२ बॉलमध्ये ६८ रनची गरज आहे. आणि अजुनही ३ विकेट बाकी आहेत इरफान पठाण आणि आश्विन खेळत असल्याने अजुनही मॅच जिंकण्यासाठीचे प्रयत्न मात्र सुरू आहेत.

 

ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या वन डे मॅचमध्ये भारताच्या आघाडीच्या बॅट्समननी पूर्णपणे निराशा केली. भारतीय बॅट्समन अत्यंत चुकीचे फटके मारून आऊट झाले. मलिंगाने सेहवाग साठी योग्य प्रकारे जाळं पसरवलं होत, त्यात सेहवाग आपसूक सापडलाच पहिल्याच ओव्हरमध्ये सेहवागने मलिंगाचा शॉर्टपिच बॉलला थॅर्डमॅनवरून टोलवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा अगदी सोपा कॅच कुलशेखरांने पकडला सेहवाग शून्यावर आऊट झाला.

 

तर नेहमीप्रमाणे सचिनने निराशा केलीच. तो २२ रनवर आऊट झाला. तर गंभीर देखील जास्त वेळ टीकू शकला नाही. त्यामुळे तीन महत्त्वाचे बॅट्समन झटपट आऊट झाल्याने भारतासमोरचं आव्हान खडतर भासू लागलं आहे. रैना २१ आणि कोहली ३५ रनवर खेळत आहे. भारताला जिंकण्यासाठी आणखी २४ ओव्हरमध्ये १६७ रनची गरज आहे.

 

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या तिसऱ्या वन डे मॅचमध्ये श्रीलंकेने २८९ रनचा डोंगर भारतासमोर उभारला आहे. त्यामुळे आता भारत हे आव्हान पार करणार की, पुन्हा एकदा ढेपाळणार हे लवकरच कळेल. श्रीलंकेने सुरूवात चांगली केली. मात्र त्यांचे तीन बॅट्समन झटपट आऊट झाल्यानंतर ते पुन्हा एकदा दबावाखाली आले होते.

 

पण भारतीय बॉलर तो दबाव कायम ठेवण्यात यशस्वी झाले नाही. थिरीमन्ने यांने सर्वाधिक ६२ रन केले. तर अँजेलो मॅथ्य़ूसने ३७ बॉलमध्ये ४९ रन केले. त्याने शेवटच्या दहा ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे श्रीलंका इतक्या मोठ्या स्कोरपर्यंत मजल मारू शकली.

 

भारत वि. श्रीलंका सुरू असलेल्या वन डे मॅच मध्ये श्रीलंकेने चांगली सुरूवात केली, मात्र भारतीय बॉलरने झोकात पुनरागमन करत श्रीलंकेच्या खेळाडूंना बॅकफूटवर जाण्यास भाग पाडलं आहे. जयवर्धने आणि दिलशाना यांनी सुरूवातीलाच टीम इंडियावर प्रहार करण्यास सुरवात केली. श्रीलंकेच्या आतापर्यंत ४ विकेच मिळविण्यात भारतीय बॉलरांना यश आलं आहे

 

जयवर्धने ४५ तर दिलशान ५१ रनची खेळी करून टीमला चांगली सुरूवात दिली पण हे दोघं आऊट झाल्यावर कॅप्टन संगकारा देखील लगेचच माघारी परतला. त्यामुळे भारताने आता पुन्हा मॅचवर पकड मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. इरफान पठाण, २ विकेट घेतल्या तर उमेश यादव आणि आर. आश्विन यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेतल्या. इरफान पठाणने जयवर्धनेला सेहवागकरवी आऊट केले तर घातक दिलशानला आश्विनने आपलं शिकार बनवलं.

 

ब्रिस्बेन येथे भारत वि. श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या वन डे मॅच मध्ये श्रीलंका भक्कम स्थितीत आहे. टॉस जिंकून श्रीलंकेने प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय देखील योग्य असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. डावाची सुरवात करण्यासाठी आलेल्या जयवर्धने आणि दिलशान यांनी त्यांच्या कॅप्टनचा निर्णय देखील सार्थ ठरवला. पहिल्या १५ ओव्हरपर्यत श्रीलंकेने त्यांची एकही विकेट गमावली नाही.

 

तसचं  १५ ओव्हरपर्यंत त्यांनी ७० रन इतकी मजल मारली होती. त्यामुळे श्रीलंका सध्या तरी भक्कम स्थितीत असल्याचे दिसते. तर भारतीय बॉलर अगदीच निष्प्रभ ठरले. त्यांना श्रीलंकेची एकही विकेट झटपट घेता आली नाही. त्यामुळे आता श्रीलं