`मन्या सुर्वे` फेसबुकवरही त्याचीच चर्चा...

‘शूट आऊट ऍट वडाला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे आणि ‘मन्या सुर्वे’ पुन्हा एकदा चर्चेत आला. मन्या सुर्वे हा महाराष्ट्रातील पहिला एन्कांऊटर झालेला गुंड आहे.

Updated: May 9, 2013, 01:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘शूट आऊट ऍट वडाला’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे आणि ‘मन्या सुर्वे’ पुन्हा एकदा चर्चेत आला. मन्या सुर्वे हा महाराष्ट्रातील पहिला एन्कांऊटर झालेला गुंड आहे. मात्र सिनेमा आल्यानंतर मन्या सुर्वे या नावभोवतीच वलय निर्माण झाल्याचं दिसून येतयं. फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर मन्या सुर्वे यांच्या नावाने वेगवेगळ्या गोष्टी शेअर केलं जातं आहेत. त्याचे फोटो त्याच्याबद्दलची माहिती ही फेसबुकवर पाहायला मिळते आहे. ‘शूट आऊट ऍट वडाला’ या चित्रपटाच्या निमित्ताने मन्या सुर्वे घरोघरी पोहोचल आहे. या रियल स्टोरीने बॉक्स ऑफीसवर मात्र चांगलीच कमाई केली आहे.
मनोहर सुर्वे मूळचा रत्नागिरीच्या खेड्यातील तरुण मुंबईत येतो काय...? दादरच्या कीर्ती कॉलेजमधून डिग्री मिळवूनही तो अंडरवर्ल्डमध्ये जातो कसा... याचा प्रचार चित्रपटापेक्षा फेसबुकवरच अधिक सुरू आहे. मन्याचे जीवन सेल्युलॉईडवर पाहताना तो गुंड होता, गँगस्टर होता हे मराठी तरुण विसरत असून तो मराठी होता एवढाच मुद्दा त्यांच्या लक्षात राहत आहे... मग मन्या जर एन्काऊंटरमध्ये मारला गेला नसता तर तो उद्या दाऊद इब्राहिमलाही नडला असता अशा फुशारक्याही मारल्या जात आहेत.

मन्याला कुठल्याशा प्रकरणात सक्तमजुरी झाल्याने पुण्याच्या येरवडा तुरुंगात ठेवले होते. तेथे त्याने सुहास भाटकर ऊर्फ ‘पोत्या भाय’ याच्याशी ‘टसन’ घेऊन हाणामार्याय केल्या. नंतर त्याला घाबरून त्याची रवानगी रत्नागिरीला पोलीस करतात. नेमका हाच फायदा उचलत १४ नोव्हेंबर १९७९ साली पोलिसांच्या तावडीतून मन्या पळतो. तत्पूर्वी रत्नागिरीच्या तुरुंगातही तो उपोषणाचं हत्यार उपसून २० किलो वजन घटवितो आणि थेट मुंबईचा रस्ता धरतो.
मन्या मुंबईत धारावीचा शेख मुनीर व डोंबिवलीचा विष्णू पाटील यांची मदत घेऊन गँग स्थापतो. नंतर उदय शेट्टी त्यांना येऊन मिळतो. तुरुंगात ‘जेम्स हेडली चेस नॉव्हेल वगैरे वाचून तो... तशाच पद्धतीने दरोडे... टाकतो. गाड्या पळवितो. सायन-ट्रॉम्बेच्या कॅनरा बँकेत दरोडा टाकून १.६ लाख पळवितो. त्या काळात दाऊद आणि वरदराजन मुलांची भरती आपल्या कंपनीत करीत असतानाही मन्याने कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दाऊद इब्राहिमशी संधान बांधले नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्यांचे मत पुरेसं बोलकं आहे.
गँगस्टर मन्याच्या कारवायांनी त्रस्त झालेल्या मुंबई पोलिसांनी अखेर १२ जानेवारी १९८२ रोजी वडाळा जंक्शन आंबेडकर कॉलेजजवळ फिल्डिंग लावली. एका ब्युटीपार्लरमध्ये मैत्रिणीसोबत टॅक्सीतून उतरत असताना मन्याचे एन्काऊंटर झाले. एसीपी इसाक बागवान आणि राजा तांबट यांनी पाच बुलेट त्याच्या छातीत ठोकल्या आणि महाराष्ट्रातलं पहिलं एन्काऊंटर घडलं. नंतर १९८२ ते २००४ पोलीस चकमकीत ६२२ गँगस्टर मारले जातात, पण त्याची मुहूर्तमेढ मन्या रोवतो! म्हणून मन्याला महत्त्व!
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.