भिंत (कथा)

उध्वस्त गावाच्या भग्न घरांच्या रांगेतून, जरा पुढे, त्याच त्या कोपऱ्यात ‘ती’ भिंत विषण्णपणे उभी आहे. उन्हा-पावसात कणा कणाने ढासळत आहे... निसर्ग नियमानुसार...

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Nov 2, 2013, 07:59 PM IST

.
.

उध्वस्त गावाच्या भग्न घरांच्या रांगेतून, जरा पुढे, त्याच त्या कोपऱ्यात ‘ती’ भिंत विषण्णपणे उभी आहे. उन्हा-पावसात कणा कणाने ढासळत आहे... निसर्ग नियमानुसार...
गावातील लोकसंख्या पाहता हे गाव मुस्लिम बहुल होते. पण, हिंदूही जवळपास तितकेच होते. संख्येने मुस्लिम जास्त होते. तर सधनतेच्या दृष्टीने हिंदू वर होते. हिंदूंच्या प्रचंड जमिनी कसण्याचे काम मुस्लिम शेतमजुर करत. मुस्लिम दुकानदारांचे ग्राहक बहुतांश हिंदू असत. गावात तसा एकोपा होता. पण तो किती खोलवर रुजला होता, याबद्दल शंकाच होती. गाव तसं चिरेबंदी. त्यात नदीकाठी. पुराचा धोका नेहमीचाच. गावाची वस्ती फारशी नव्हती. लहान लहान वाड्या... कौलारू घरं... कोपऱ्यातली मशीद हिच एकमेव मोठी वास्तू. पण, मंदीर म्हणावं, अशी कुठलीच वास्तू नव्हती; याची खंत बऱ्याच हिंदूंना होती. तसं म्हटलं, तर घराघरांत देवतांचं पूजन होई. कोपऱ्या कोपऱ्यांवर शेंदुर फासलेले दगड होते. जाता येता मुस्लिमही सवयीनुसार या कोपऱ्यांवरील अनामिक देवतांना हात जोडून पुढे जात. कुणालाच त्यात काही आक्षेपार्ह वाटत नव्हतं. तरीही, गावात एखादं मोठं मंदीर असावं, अशी बहुतेक हिंदूंची इच्छा होती. भजन, सत्संग यांसारखे कार्यक्रम मंदिरात व्हावेत.आपल्या पोराबाळांना घेऊन तिकडं जावं, मंदिरात भागवतांनी ऐकवलेल्या राम-कृष्णाच्या कथांमधून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत अशी हिंदू स्त्रियांची इच्छा होती. या इच्छेत वाईट काहीच नव्हतं. पण, गावात एक अवाढव्य मशीद मोठी म्हणून, त्याहून मोठं मंदीर असावं हा हट्ट का? आणि हा हट्ट माणसांचाच... देवांचा नाहीच.
मंदीर धार्मिक संस्कारांची बीजं रोवण्यासाठी असावं, कलहाची नव्हे. घराघरांत भगवद् गीता वाचली जाते, ती युद्धाचं उदात्तीकरण करायला तर नाही ना! पण जर गावात मोठं मंदीर नसेल, गाव हिंदूंचं आणि हिंदूंचंच आहे, हे कसं जणवणार? तेव्हा, मंदीर हे हवंच. ते मशिदीहून भव्यही हवं आणि मोक्याच्या ठिकाणीही हवं, म्हणजे गावात आकर्षणाचं केंद्रस्थान हे मशिदीचा घुमट नाही, तर मंदिराचा कळस हेच असावं, अशी मनातल्या मनात सुप्त इच्छांचं स्वरूप अधिकाधिक विकट होऊ लागलं होतं.
पारावरती सभा होऊ लागल्या मुस्लिमही या सभांमधअये सहभागी होत होते. पण जसजसा मंदीर बांधण्याचा विषय वादाचा होऊ लागला, तसतसे मुस्लिम कमी होऊ लागले. काही मुस्लिमांना गावात बांधल्या जाणाऱ्या मंदिराबद्दल आकर्षण होतं. मात्र, ते हळूहळू ओसरू लागलं.
मंदीर बांधायचं, पण ते कुठल्या देवाचं? हा पहिला प्रश्न उभा राहिला. “अर्थातच, शंभू महादेवाचं!... ते किती पवित्र वाटेल... ते शिवलिंग, तो दगडी नाग, ते अभिषेकपात्र... तो दुधाचा ओहोळ”, “त्यापेक्षा रामाचं मंदीर बांधू”, “त्यापेक्षा कृष्णाचं मंदीर बांधूया”
मूर्ती इस्लामला अमान्य असल्याचं मुस्लिमांना अचानक आठवलं. मंदिरावर आक्षेपही घेण्यात आला. हे आक्षेप घेणारे मुस्लिम कुठले होते, हे गावातल्या मुस्लिमांनाही माहित नव्हतं. पण अचानक एक दिवस गावातल्या मौलवी साहेबांनी म्हटले, “आम्हाला गावच्या हिंदूंशी काही देणं-घेणं नाही. त्यांनी कुणाचंही मंदीर बांधावं, आमचा त्याच्याशी संबंध नाही.”
“असं कसं बांधलं जाणारं मंदीर या गावात असणार आहे आणि मुस्लिम या गावातच राहातात. तेव्हा गावात साधा हौद बांधणं असो किंवा मंदीर... मुस्लिमांना सहभाग नसला, तरी संबंध असणारच”- हमीद म्हणाला. दुसऱ्या गावाचे लोक हमीदला शोधू लागले. “दुसऱ्या गावातल्या लोकांना आपल्या गावातल्या गोष्टींशी काय देणं घेणं?”- इसाक म्हणाला.
“दुसऱ्या गावचे मुस्लिम जे काही करत आहेत, त्यांना आपली काळजी आहे म्हणूनच. धर्म वैश्विक आहे. ते जगाचा विचार करतात. आपण फक्त वीतभर गावाचाच विचार करतात. हे चुकीचं आहे.” – सलीम म्हणाला.
इथे गणेश मंदीर बांधण्याचा निर्धार पक्का झाला. मंदीर गावाच्या एका कोपऱ्यात बांधले जाईल. तो कोपरा मशिदीच्या अगदी विरुद्ध दिशेला असणार. गावाच्या भटजींनी तसा सल्ला दिला होता. त्यासाठी त्यांनीवास्तूशास्त्राचे इतर कुणालाही न समजणारे दाखले दिले. पण त्यांच्या या न समजणाऱ्या दाखल्यांमागे जिल्ह्यातून आलेल्या राजकारण्यांचा सल्ला कारणीभूत होता.
जिल्ह्याच्या गावाहून काही मुस्लिम नेते मशिदीची भेट घ्यायला आले होते. हुक्कापाणी चालू असतानाच गावातल्या मुस्लिमांची संख्या कमी असल्याबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली. मशिदीच्या जीर्णोद्धारासाठी शासकीय मदतही देण्याचं श्वासन त्यांनी दिलं. ही बातमी ऐकून गावातल्या हिंदूंचा तीळपापड झाला. आपल्याला तर मदतीची जास्त गरज असल्याची जाणी