सही रे सही !

तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 4, 2012, 01:21 PM IST

www.24taas.com,मुंबई
चेक लिहिताना सावधान !

चेकवरची सही चुकत तर नाही ना ?

सहीतील तफावत पडेल महागात !

सही चुकल्यास जावं लागेल तुरुंगात !

जर तुम्ही आर्थिक व्यवहार चेकने करत असाल तर हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण चेकवर सही करण्यास तुम्ही विसरलात, किंवा सही करतांना चूक झाल्यास तुमच्यावर तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते. वाचून धक्का बसला ना. मग घ्या खबरदारी.
चेकधारकांनो सावधान !, चेक लिहिल्यानंतर पुन्हा एकदा तपासून घ्या सही!, तुम्ही चेकवर सही केलीय?, चेकवरची सही चूकली तर नाही ना? याची पुन्हा चाचपणी करू घ्यावी. खरं तर ही किरकोळ चूक आहे... पण आता चेकधारकांना ही चूक भलतीच महाग पडण्याची शक्यता आहे..जर चेकवर सही करतांना चूक झाल्यास तसेच चेक बाऊन्स झाल्यास तुमच्यावर होणार फौजदारी. त्यामुळे किरकोळ चूक महागात पडेल, हे मात्र नक्की. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलाय.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय सांगतो?
चेकवरील सहीत तफावत आढळल्यास ठरणार गुन्हा!,`चेकवरची सही ही बँकेतल्या सहीशी तंतोतंत जुळायलाच हवी. कारण सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाला तर खातेदारावर फौजदारी कारवाई करा`

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधिश टी.एस. ठाकूर आणि न्यायाधीश सुधा मिश्रा यांच्या खंडपिठाने गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबादल ठरवत हा निकाल दिलाय.

गुजरात उच्च न्यायालयाचा निकाल

चेकधारकाने चेक दिल्यानंतर आपल्या खात्यात चेक वटवण्याइतकी रक्कम न ठेवल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र सहीतल्या फरकामुळे चेक बाऊन्स झाल्यास खातेदारावर कारवाई फौजदारी कारवाई करता येणार नाही`

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देतांना हेही स्पष्ट केलं आहे की अशा प्रकरणात बँकेने चेक परत करते वेळी संबधीत खातेधारकाला नोटीस देणे आवश्यक आहे..तसेच खातेदारा विरुद्ध फौजदारी खटला भरण्यापूर्वी त्याला ती रक्कम जमा करण्याची संधी दिली पाहिजे.

चेकवरची सही चुकल्यास चेक धारकारवर फौजदारी खटला चालवला जाऊ शकतो.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे चेकच्या मध्यमातून होणा-या फसवणुकीला आळा बसणार आहे. न्यायालयाच्या निकालाचा बँक खातेदारांना फायदा होणार आहे. पण बँक त्यावर अंमलबजावणी कशी करणार, हा खरा प्रश्न आहे. वाढत्या वयोमानाप्रमाणे सहीत बदल होतो. त्यावर बँक कोणता मार्ग काढणार? यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना कशा प्रकारे आळा बसेल? चेकवर सही करतांना चूक झाल्यास कोणते परिणाम होऊ शकतात, याची माहिती बँकांकडून आपल्या खातेदारांना दिली जातेय का? हा देखील एक प्रश्न आहे.

चेक फसवणुकीवर लगाम!
या निकालामुळे पारदर्शकता वाढीला लागेल. तर बँक व्यवहारिक कसं बनवणार, हा प्रश्न आहे. तसेच वाढत्या वयाबरोबरच सहीत बदल होतो . बँक यावर कोणता उपाय शोधणार आहे का?,चेक फसवणुकीवर कसा लगाम लावणार?, सही चुकल्यास होणा-या कारवाईची माहिती बँकेकडू दिली जातेय का? आदी प्रश्न आहेत.
देशात चेक आणि ड्राफ्टच्या माध्यमातून होणा-या फसवणुकीच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होतेय. त्यातून बँकेला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतंय. चेक आणि ड्राफ्टच्या वाढत्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवरमुळे भारतीय रिझर्व बँकेनं देशभरात सीटीएस अर्थात चेक ट्रंकेशन सिस्टम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बँकांना हायटेक सिक्युरिटी फिचरवाले चेक पुरविण्यात येणार आहेत. या चेकसाठी चेक वटवतांना इमेज बेस्ड चेक प्रोसेसिंग योजना तयार करण्यात आलीय. त्यामुळे आगामी काळात चेकचा व्यवहार अधिकाधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न रिझर्व बँकेककडून केला जाणार आहे.

आता मिळणार नवीन चेक
चेकच्या माध्यमातून होणा-या फसवणुकीला आळा घालण्यासाठी रिझर्व बँक प्रयत्न करत आहे. त्यामुळेच नवीन वर्षात तुमची बँक जुन्या पद्धतीचे चेक स्विकारणार नाही. त्यामुळेच बँकांनी आपल्या खातेदारांना ३१ डिसेंबरपूर्वी नवीन पद्धतीचे चेक बुक घेऊन जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जर तुम्ही तुमच्या बँकेतून नवीन मानांकन असलेलं चेक बुक घेतलं नसेल तर जास्त उशीर करु नका.कारण ३१ डिसेंबर नंतर जुन्या चेकच्यामाध्यमातून तुम्हाला कोणताच आर्थिक व्यवहार करता येणार नाही. केवळ नवीन चेकच्या माध