मोबाईलचा नवा अवतार

मोबाईल फोन बदलल्यास, तुम्ही कॅन्सरपासून तुमचा बचाव करु शकता हे तुम्हाला माहित आहे का ? जर तुम्हाला याबद्दल माहित नसेल, तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.

Updated: Sep 8, 2012, 12:13 AM IST

www.24taas.com, मुंबई
लवकरच बदलणार तुमचा मोबाईल फोन !
कशामुळे होणार आहे हा बदल ?
कोणी घेतलाय हा निर्णय ?
तुमचा फायदा होणार की तोटा ?
मोबाईलचा नवा अवतार

मोबाईल फोन बदलल्यास, तुम्ही कॅन्सरपासून तुमचा बचाव करु शकता हे तुम्हाला माहित आहे का ? जर तुम्हाला याबद्दल माहित नसेल, तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.. एक सप्टेंबरपासून केंद्र सरकारने एक नवं धोरण लागू केलं आहे...त्यामुळे मोबाईल फोनच्या रेडिएशनपासून तुमचं रक्षण होणार आहे.. मोबाईलमुळे जग पार बदलून गेलंय..जगाच्या कोणत्याही कानकोप-यात अवघ्या काही सेकंदात तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीशी सहज संपर्क करु शकता..मोबाईलचे फायदे अनेक आहेत...
पण मोबाईलचे जेव्हडे फायदे आहेत तेव्हडाच तो धोकेदायकही आहे....त्यामुळेच आता तुमचा मोबाईल बदलणार तर नाही ना ? आज पर्यंत तुम्ही मोबाईलचे अनेक फायदे बघीतले आहेत पण मोबाईलमधून बाहेर पडणा-या रेडिशनची तुम्हाला जाण आहे का ? त्याविषयी कदाचीत तुम्हाला माहिती नसेल पण सरकारच्या ती गोष्ट लक्षात आली आहे..तो धोका लक्षात घेऊनच मोबाईलचे नियम बदलण्यात आले आहेत.. मोबाईलमुळं नेमका कोणता धोका होवू शकतो हे आता आम्ही तुम्हाला दाखविणार आहोत..तसेच तुम्हाला तुमचा मोबाईल फोन बदलावा लागणार आहे का याचीही उलगडा करणार आहोत..
मोबाईल फोनच्या रेडिएशनचे माणसाच्या मेंदूवर गंभीर परिणाम होत असल्याचं आज पर्यंत देश विदेशात करण्यात आलेल्या अनेक संशोधनातून उघड झालं आहे..मोबाईलचा सिग्नल देणारे टॉवरही धोकादायक असल्याचं जानकारांचं म्हणनं आहे..मानवी वस्तीत उभरण्यात आलेले मोबाईल टॉवर धोकेदायक ठरु लागले आहेत..मोबाईल टॉवर परिसरात राहणा-या नागरिकांना कॅन्सर सारखा गंभीर आजार जडल्याचं आढळून आलंय...या सगळ्या परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर आता भारतातही मोबाईल संबंधीचे नियम बदलण्याची तयारी सुरु झालीय..

देशात वाढती मोबाईल धारकांची संख्या आणि मोबाईलमुळे होणारा धोका लक्षात घेता सरकारने मोबाईलच्या रेडिएशनची तीव्रता कमी करण्याचा निर्णय घेतलाय. मोबाईलच्या रेडिएशनची तीव्रता कमी केल्यामुळे लोकांच्या आरोग्याला त्याचा फायदा होणार आहे..पण त्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल बदलावा लागणार आहे.. रेडिएशनचा धोका लक्षात घेऊन सरकारने मोबाईलच्या स्पेसिफिक एब्जॉर्बशन सेट अर्थात एसएआर २.० वरून १.६ वर आणला आहे...त्यामुळे मोबाईलधारकाचं रेडिएशनच्या धोक्यापासून संरक्षण होणार आहे.. या सगळ्यामुळे आपला मोबाईल फोन बंद तर पडणार नाही ना अशी जर शंका तुम्हाला आली असेल तर ती साफ चूक आहे..तुमचा मोबाईल फोन पूर्वीप्रमाणेच काम करील. कमी रेडिएशन मानांकनावर आधारीत मोबाईल फोन हॅन्डसेट लवकरच बाजारात उपल्बध होतील..

मोबाईल फोनच्या रेडिएशन विषयी आम्ही वारंवार तुम्हाला जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे..मोबाईल फोन जवळ येताच रेडिएशनची तीव्रता वाढते आणि त्याचा तुमच्या ह्रदयावर तसेच मेंदूवर परिणाम होतो..मोबाईलमुळे होणा-या धोक्याविषयी आजही मतभेद आहेत..पण मोबाईलचं रेडिएशन कमी करण्याची आवश्यकता असल्याच सरकारने संसदेत सांगीतलं आहे....पण ९० कोटी जनतेचा विचार करता या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला एक वर्षाचा कालावधी लागणार आहे.. म्हणजेच २०१३मध्ये जे मोबाईल फोन बाजारात उपलब्ध असतील ते नव्या नियमांवर आधारीत असणार आहेत. रशिया , चीन आणि पोलंड या देशांमंध्ये मोबाईलच्या रेडिएशनची तीव्रता अत्यंत कमी आहे..आता भारतही त्या देशांच्या यादीत सहभागी होणार आहे.
मोबाईल रेडिएशनच्या नव्या नियमावलीनुसार आता मोबाईल कंपन्याना तब्बल 3 हजार 300 नवे टॉवर उभारावे लागणार आहेत.. आणि यासाठी त्यांना खर्च करावा लागणार आहेत तब्बल एक हजार कोटी रुपये.. आपल्या जवळच्या व्यक्तिशी संपर्क साधण्याशाठी मोबाईलधारकाला मोबाईल टॉवरची जेव्हडी गरज असते तेव्हडाच त्याला त्यापासून धोकाही असतो..कारण मोबाईल टॉवरमधून बाहेर पडणारं रेडिएशन जर जास्त तीव्रतेचे असेल तर त्यामुळे तुम्हाला आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही......

टॉवरमधून निघालेल्या रेडिएशनमुळे आजारांना बळी प़डलेल्यांची अनेक उदारहरणं जगभरात समोर येतायत.. टॉवरच्या परिसरात राहणा-या नागरिकांना कॅन्सर सारख्या गंभीर आजाराला बळी पडावं लागलय.. आणि विशेष म्हणजे सरकारलाही या गंभीर धोक्याची पुर्ण कल्पना आहे... आणि म्हणूनच आता सरकारनं या गंभीर रेडिएशनच दखल घेतलीय..
१ सप्टेंबरपासू