डॉ. आंबेडकरांचे कधी होणार स्मारक ?

आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि उपनगरांमध्ये आंदोलन सुरु केलंय...डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरीत देण्यात यावी अशी आरपीआयची मागणी आहे....पण हे स्मारक कधी उभं राहणार असा प्रश्न आता आंबेडकरी जनतेकडून विचारला जात आहे.

Updated: Jun 12, 2012, 10:34 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई आणि उपनगरांमध्ये आंदोलन सुरु केलंय...डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा त्वरीत देण्यात यावी अशी आरपीआयची मागणी आहे....पण हे स्मारक  कधी उभं राहणार असा प्रश्न आता आंबेडकरी जनतेकडून विचारला जात आहे. राजकारणात अडकलीय का इंदू मिलची जमीन? इंदू मिलच्या प्रश्नावर सरकार खरंच  गंभीर आहे का  ? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेतला आहे. प्राईम वॉचमध्ये...कधी होणार स्मारक ?

 

 

इंदू मिलच्या प्रश्नावरुन आरपीआय आठवले गटाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत...मुंबईसह उपनगरात ठिकठिकाणी आंदोलन केलं गेलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी जमीन देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाने केला.

 

 

ही दृष्य आहेत आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची. मुंबई आणि उपनगरांमध्ये आरपीआय कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरु केलंय...ठिकठिकाणी रेल्वे  आणि महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. भारतीय राज्यघटनेची शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा तात्काळ देण्यात यावी या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे.

 

 

मुंबईत आरपीआय कार्यकर्त्यांनी बोरीवली स्टेशनवर रेल्वे रोखून धरत स्टेशनबाहेरही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केलाय...बोरीवली प्रमाणेच भांडूप स्टेशनवरही कार्यकर्त्यांनी कल्याण-सीएसटी लोकल रोखून धरली.. वरळी नाका आणि मुलुंड मध्येही रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे पुन्हा एकदा इंदू मिलचा विषय चर्चेत आला आहे.  गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इंदू मिलच्या मुद्द्यावरुन आनंदराज आंबेडकर यांनी मोठं आंदोलन केलं होतं. आनंदराज आंबेडकर आणि त्यांच्या समर्थकांनी  इंदू मिलचा ताबा घेतला होता.त्याआंदोलनानंतर  ही जमीन बाबासाहेबांच्या स्मारकासाठी देण्याच्या हलचालींना वेग आला. पण प्रत्यक्षात जमीन काही हस्तांतरीत केली गेली नाही...त्यामुळेच  रिपब्लिकन पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्विकारलाय.

 

इंदू मिलच्या प्रश्नावरुन आरपीआयने आंदोलन सुरु केलंय खरं पण त्यावरुनही आता आरपीआय आठवले गट आणि रिपब्लिकन सेना यांच्यात कलगीतुरा रंगू लागलाय. रामदास आठवलेंना आताच का इंदू मिलचा प्रश्न आठवला, असा सवाल आनंदराज आंबेडकरांनी केला आहे. मुंबईत बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात राजकारण्यांकडून अशा प्रकारे  वेळोवेळी आश्वासनं देण्यात आली खरी  पण त्यावर प्रत्येक्षात कारवाई मात्र केली गेली नाही.

 

 

नवं आश्वासन ...जनतेची बोळवण

बाबासाहेबांची जयंती असो की महपरिनिर्वान दिन ... प्रत्येकवेळी राजकारण्यांनी नवं आश्वासन देवून आंबेडकरी जनतेची बोळवणच केलीय...दादरच्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांचं भव्य स्मारक उभारण्यात यावं अशी आंबेडकरी जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची  मागणी आहे...चैत्यभूमीला लागून असलेली इंदू मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी मिळावी म्हणून   रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनतेकडून पाठपुरावाही केला जातोय

 

.. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात याच मुद्द्यावरुन म