Zeenews logo
English   
Monday, May 20, 2013 
Search
Follwo us on: Facebook Follwo us on: Twiter Follwo us on: google+ RSS Mail to us Mail to us

६ जिल्ह्यातील बँकांचं काही खरं नाही

Tuesday, April 10, 2012, 16:39
Comments 0
 
टॅग्स::
www.24taas.com, मुंबई
 
राज्यातल्या सहा जिल्हा बँका अडचणीत सापडल्या आहेत. या बँकांना परवाने देण्यास आरबीआयनं नकार दिला आहे. आरबीआयच्या नियमांची पूर्तता न केल्यानं आरबीआयनं हा निर्णय घेतला आहे.
 
यात दिवाळखोरीत गेलेल्या नागपूर, वर्धा, बुलढाणा, धुळे आणि जालना, उस्मानाबाद या जिल्हा बँकांचा समावेश आहे. सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ही माहिती विधिमंडळात दिली आहे. या बँका दुसऱ्या बँकांमध्ये विलिनीकरण करण्याचा पर्याय सरकारसमोर आहे. मात्र तरीही बँका वाचवण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे.
 
तर याआधी धुळे नंदूरबार जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं होतं. नाबार्डच्या शिफारशीवरुन आरबीआयनं ही कारवाई केली होती. जिल्हा बँकेवर तीन अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. बँकेचं थकीत कर्ज वाढल्यानं ही कारवाई करण्यात आली होती.
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, April 10, 2012, 22:13

प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

नाव:
ठिकाण:
ई-मेल आयडी:
प्रतिक्रिया: