सोळाव्या लोकसभेसाठीचं मतदान संपन्न

सोळाव्या लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील 41 जागांसाठीचे मतदान आज पार पडले. लोकसभा निवडणुकीचं मतदान एकूण सात टप्प्यात घेण्यात आलं. यावेळेसही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान पार पडलं आहे.

Updated: May 12, 2014, 06:23 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, वाराणसी
सोळाव्या लोकसभेच्या अखेरच्या टप्प्यातील 41 जागांसाठीचे मतदान आज पार पडले. लोकसभा निवडणुकीचं मतदान एकूण सात टप्प्यात घेण्यात आलं. यावेळेसही पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान पार पडलं आहे.
यानंतर देशाचं लक्ष्य आता 16 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीवर असणार आहे. अखेरच्या टप्प्यात वारणसीतील मतदान सर्वात जास्त गाजलं.
कारण भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडणूक उमेदवार आहेत, त्यांच्या विरोधात आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची उमेदवारी आहे.
नरेंद्र मोदी यांच्याशी आपली सरळ लढत असल्याचं यापूर्वीचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. अजय राय हे वाराणसीतून काँग्रेसचे उमेदवार आहेत. गुजरातच्या बडोदामधूनही नरेंद्र मोदी हे निवडणूक लढवत आहेत.
सोळाव्या लोकसभेच्या मतदानाला 7 एप्रिल रोजी सुरूवात झाली होती. आज 12 मे रोजी या मतदानाच्या शेवटच्या टप्प्यांची सांगता झाली आहे.
जगातील सर्वात मोठी लोकशाहीचा कौल आता काय असेल, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.