काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jun 1, 2014, 12:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता. मात्र मंत्रिपदाच्या नावावरून अजूनही घोळ कायम असल्यानं आता शपथविधी आज रात्री किंवा उद्या सकाळी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माणिकराव ठाकरे अजूनही दिल्लीतच आहेत.
दरम्यान, मंत्रीपदासाठी अब्दुल सत्तार, अमित देशमुख, बागवे, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार यांच्या नावांची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा दोनच दिवसांपूर्वी शपथविधी झाला. मग काँग्रेसनं आज का? ही पुन्हा आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं सुचवतंय का? हा प्रश्न यामुळं निर्माण होतोय. आघाडी दोन वेगवेगळं सरकार राज्याला देवू पाहतंय का?, असंही विचारलं जातंय.
देशात अजूनही नरेंद्र मोदींची लाट आहे. त्यात राज ठाकरेंनीही निवडणूक रिंगणात उतरण्याचं जाहीर केल्यानं. आघाडीनं त्यांच्या भविष्यासाठी एकत्र काम करणं गरजेचं आहे. मात्र आघाडीच्या सरकार विस्ताराच्या वेगवेगळ्या शपथविधी कार्यक्रमातून मात्र वेगळे संकेत मिळतायेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.