साथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय

आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.

Updated: Jul 2, 2016, 02:08 PM IST
साथीचे आजाराने घाबरुन जाऊ नका, हा करा घरगुती सोपा उपाय title=

मुंबई : आता पावसाळा सुरु झालाय. साथीच्या आजारात वाढ होते. साथीचे आजार पसरायला लागले की काळजी वाटते. घरातली लहान मुले आणि वडीलधारी माणसे, त्यांच्या तब्येतीची कुरकूर सुरु होते. मात्र, तुम्ही घाबरु नका यावर घरगुती उपाय एकदम बेस्ट.

आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेकजण जाहिरांती बळी पडतात. ‘इम्युनिटी’ वाढविण्यासाठी  आपल्या आहारात काही सातत्यपूर्ण बदल करावे लागतील. काही छोटय़ा गोष्टी नियमित केल्या तर आपण आपली प्रतिकारशक्ती त्यातल्या त्यात चांगली ठेवू शकतो. आपण घरी आहे ते नियमित केले तर आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी मदत होईल.
 
तुळस  
रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुळशीची आठ ते दहा पाने रोज चावून चावून खावीत. यामुळे शरीरात जंतूसंसर्ग होत नाही. त्याला अटकाव होतो.
 
तूप 
कोणत्याही वयोमानात शरीराचे पोषण करायचे असेल तर अर्धा चमचा तूप खावे. तूप म्हणजे चांगल, शुध्द तूप. घरी लोणी कढवून काढलेले तूप अतिशय चांगले. अनेकजण आपल्या आहारात चीज, बटर असल्याचे सांगतात. पण जी कमाल अर्धा चमच तूप करते ती या पदार्थाना जमत नाही.
 
लिंबू 
लिंबामध्ये मोठ्या प्रमाणात 'क' जीवनसत्त्व असते. एक अख्खं लिंबू आपण खावू शकत नाही. पण लिंबाची एक फोड मात्र सहज खावू शकतो. पण लिंबू खावे. लिंबाचे लोणचे खावू नये. 

आवळा
आवळा हा प्रामुख्याने हिवाळ्यात मिळतो. पण मुरंबा, मोरआवळा, कॅंण्डी या स्वरूपात वर्षभर आवळा उपलब्ध असतो. रोज थोडा तरी आवळा पोटात गेला तरी आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते.
 
पाणी 
आरोग्याच्यादृष्टीने पाण्याला अधिक महत्व आहे. आपल्या शरीरात ७० टक्क्यांपेक्षाही जास्त पाणी असते. पाण्याची तहान लागली तर ती पाण्यानेच भागेल. तहान लागली पाणी नाही म्हणून दूध, मिल्क शेक, नारळपाणी, ज्यूस घेतले तर तहान भागत नाही. उलट शरीराची पाण्याची गरज पूर्ण झाली नाही तर पाण्याला पर्याय म्हणून पोटात टाकलेले पदार्थ शरीर बाहेर टाकण्याचीच शक्यता जास्त असते. त्यामुळे पाणी महत्वाचे आहे. 
 
नाचणी सत्व 

दिवसभर शरीरातली ऊर्जा टिकवून धरायची असेल तर रोजच्या न्याहारीत नाचणीचे सत्व हवेच. नाचणीच्या सत्त्वामध्ये सर्व मुख्य जीवनसत्व असतात. हे नाचणी सत्व दिवसातून एकदा तरी शरीरात जाणे आवश्यक आहे.
 
बीट 
दुपारच्या जेवणात कोशिंबीर असावी. पण ती काकडी, टोमॅटो नाहीतर मुळयाचीच हवी असे नाही. उलट रोजच्या जेवणात बीटाची कोशिंबीर खाल्ल्यास एकाचवेळेस शरीराला जीवनसत्त्वं, खनिजे, अॅंन्टिऑक्सिडंटस मिळतात. बीट हे उत्तम शक्तिवर्धक आहे.   
 
दूध-हळद 
रात्री जेवल्यानंतर एक कपभर दूध उकळून त्यात एक चमचा हळद घालावी. आणि ते दूध रोज प्यावे. या दुधात चव म्हणून अनेकजण साखर घालतात. पण तसं करू नये. लहान मुलांना दूध-हळद ऐवजी दूधात थोडे केशर आणि एखादा बदाम भिजवून, वाटून ते दूध द्यायला हवे.