९ वर्षाच्या मुलाला मागच्या जन्माबाबत आठवतं सगळं काही

राजस्थानमधील हनुमानगडमधून एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. एका ९ वर्षाच्या मुलाला त्याच्या मागच्या जन्माबाबत सगळं आठवतं. जेव्हा २ वर्षाचा होता तेव्हा पासूनच तो त्याच्या मागच्या जन्माबाबत सांगतो असं त्याच्या आई-वडिलांचं म्हणणं आहे.

Updated: Jul 27, 2016, 05:07 PM IST
९ वर्षाच्या मुलाला मागच्या जन्माबाबत आठवतं सगळं काही  title=

जयपूर : राजस्थानमधील हनुमानगडमधून एक हैराण करणारी माहिती समोर आली आहे. एका ९ वर्षाच्या मुलाला त्याच्या मागच्या जन्माबाबत सगळं आठवतं. जेव्हा २ वर्षाचा होता तेव्हा पासूनच तो त्याच्या मागच्या जन्माबाबत सांगतो असं त्याच्या आई-वडिलांचं म्हणणं आहे.

एक दिवशी तो त्याच्या मागच्या आई-वडिलांना भेटण्याचा हट्ट करु लागला. जेव्हा तो त्यांना भेटायला गेला तेव्हा त्याला कळालं की त्याच्या पत्नीने दुसरं लग्न केलं आहे.

जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा पासूनच हा मुलगा म्हणायचा की हे माझं घर नाही आहे. माझे माता पिता दुसरेच आहेत. त्यानंतर ११ वर्षापर्यंत त्याच्या मागच्या जन्माच्या आठवणी या आणखी ताज्या होत गेल्या. 

गुरप्रीत म्हणतो की, काही दिवसांपूर्वी ट्रॅक्टर खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्याला एक भाऊ देखील आहे. यानंतर त्याला त्याच्या खऱ्या आई-वडिलांकडे नेण्यात आलं आणइ त्याने त्याच्या मागच्या जन्मातील आई-वडिलांना ओळखलं. मागच्या जन्मात वयाच्या २२ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला होता.