बायकोसोडून गेल्याने ६ तास वीजपुरवठा खंडीत

बायकोने सोडून जाणे हे केवढं मोठं दु:ख असतं हे तुम्हाला हा किस्सा वाचल्यानंतर लक्षात येईल, उत्तर प्रदेशातील रामप्रसादला बायको सोडून गेली, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला असावा, तो थेट इलेक्ट्रीकच्या खांबावर चढला, यामुळे तीन जिल्ह्यांचा पुरवठा तब्बल सहा तास बंद राहिला. उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात ही घटना आहे.

Updated: May 25, 2016, 05:04 PM IST
बायकोसोडून गेल्याने ६ तास वीजपुरवठा खंडीत title=

लखनऊ : बायकोने सोडून जाणे हे केवढं मोठं दु:ख असतं हे तुम्हाला हा किस्सा वाचल्यानंतर लक्षात येईल, उत्तर प्रदेशातील रामप्रसादला बायको सोडून गेली, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला असावा, तो थेट इलेक्ट्रीकच्या खांबावर चढला, यामुळे तीन जिल्ह्यांचा पुरवठा तब्बल सहा तास बंद राहिला. उत्तरप्रदेशच्या फिरोझाबाद जिल्ह्यात ही घटना आहे.

निराश झालेला रामप्रसाद सोमवारी सकाळी पाचच्या सुमारास असफाबाद गावातील १.३५ लाख व्होल्ट क्षमतेच्या वीजेच्या खांबावर चढला. पोलिसांनी त्याला पत्नीला शोधून काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर ११.३० च्या सुमारास तो खाली उतरला, कारण तो पोलिसांना पत्नीला शोधून आणण्यास सांगत होता. तुम्ही माझ्या पत्नीला शोधून आणा अन्यथा खांबावरुन उडी मारुन जीव देईन अशी धमकी तो देत होता. 

रामप्रसाद पोलवर जाताना सोबत पाण्याची बाटली, बिस्कीटे घेऊन गेला होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  रामप्रसाद पोलवर चढलेला असताना त्याला शॉक लागू नये यासाठी विद्युत विभागाला त्या पोलमधून सुरु असलेला वीज पुरवठा बंद करावा लागला.