असा प्रसंग कुणाच्याही लग्नात येऊ नये

 लग्न सर्वांसाठीच एक महत्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो, लग्नाच्या आठवणी आयुष्यभर पुरतात असंही म्हटलं जातं. 

Updated: Jul 11, 2016, 08:37 PM IST

नवी दिल्ली : लग्न सर्वांसाठीच एक महत्वाचा आणि आनंदाचा सोहळा असतो, लग्नाच्या आठवणी आयुष्यभर पुरतात असंही म्हटलं जातं. 

एक दुसऱ्यांसोबत सप्तपदीचंही स्वप्न असतं, मात्र लग्नाच्या या अत्यंत महत्वाच्या सोहळ्यात, जेव्हा सर्वांच्या नजरा वधु-वरावर खिळलेल्या असतात, तेव्हाच नवरदेवाची भरमंडपात पॅन्ट सुटली.

असं म्हणतात, लग्नात एकतर नाव घेतात, नाही तर नावं ठेवतात,वऱ्हाडी मंडळीने याचा फायदा घेत याचा व्हिडीओ यू-ट्यूबवर टाकला आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला.

या व्हिडीओत नवरदेव आपली पॅन्ट सांभाळण्याचा प्रयत्न करतोय, पण नवरदेवाच्या बहिणीने यावर उपाय काढण्याचा प्रयत्न केला आणि नवरदेवाला सावरलं.

या जोडप्यासाठी लग्नाच्या आठवणी आयुष्यभर पुरतील, पण त्यांना ही कटू आठवण विसरावी लागेल.