हिराखंड एक्स्प्रेसचे ८ डब्बे रुळावरुन घसरले, ३२ जणांचा मृत्यू

आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील कुनेरु रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झालाय. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जगदलपुर-भुवनेश्वर हिराखंड या एक्सप्रेसचे आठ डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातात ३२ ठार ५०हून अधिक जखमी झालेत. 

Updated: Jan 22, 2017, 10:38 AM IST
हिराखंड एक्स्प्रेसचे ८ डब्बे रुळावरुन घसरले,  ३२ जणांचा मृत्यू title=

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील विजयनगरम येथील कुनेरु रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात झालाय. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास जगदलपुर-भुवनेश्वर हिराखंड या एक्सप्रेसचे आठ डब्बे रुळावरुन घसरले. या अपघातात ३२ ठार ५०हून अधिक जखमी झालेत. 

जखमींवर पार्वतीपुरम येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात तब्बल रेल्वेचे आठ डबे रुळावरुन घसरले. यात इंजिनसह एक मालडबा, जनरल कोच, चार स्लीपर कोच आणि दोन एसी डब्यांचा समावेश आहे.

घटनास्थळी बचावकार्य वेगात सुरु आहे. या दुर्घटनेत रेल्वेचे काही डबे अडकलेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अद्यापही अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.