मुसलमानांसाठी भारत सर्वात चांगला देश - भाजप

बॉलीवूड अभिनेता आमिर खानने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्त्व्यानंतर देशात वादळ उठले, त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या समर्थन भाजपला खटले. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. 

Updated: Nov 24, 2015, 07:05 PM IST
मुसलमानांसाठी भारत सर्वात चांगला देश - भाजप  title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेता आमिर खानने असहिष्णूतेवर दिलेल्या वक्त्व्यानंतर देशात वादळ उठले, त्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या समर्थन भाजपला खटले. भारत हा मुसलमानांसाठी सर्वात चांगला देश असल्याचे भाजपचे नेते शहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. 

अभिनेता सलमान खानच्या असहिष्णूतेसंबधी केलेल्या वक्तव्याला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलेले समर्थन म्हणजे देशाची बदनामी करण्याचा गंध येत आहे. 

शहनवाज हुसैन म्हणाले की, आमिर खानने एक वक्तव्य करतात आणि त्याला राहूल गांधी समर्थन देतात. राहुल यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले की हा देशाला बदनाम करण्याचा कट आहे.

 
शहनावाज खान यांनी आमिर खानला सल्ला दिला की कोणत्याही कटाचा शिकार होऊ नको. आमिरवर निशाणा साधत शहनावाज म्हटले की आमिर खान घाबरला नाही तो देशाला घाबरवतो आहे. अशा वक्तव्याने देशाची प्रतिमा खराब होते. आमिर खानने विसरले नाही पाहिजे की त्याला देशाने स्टार बनवले आहे. १२१ कोटींच्या देशाच्या एखादी घटना घडते, त्यामुळे आपल्या 'अतुल्य भारता'ची प्रतिमा खराब करणे योग्य नाही. 

मुसलमानांसाठी भारतापेक्षा चांगला देश असू शकत नाही. या देशाला सोडून कुठे जाणार?  जा ठिकाणी जाल त्या ठिकाणी असहिष्णुता तुमचा पाठलाग करेल. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.