सावधान! आयसीस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत

भारतावर हल्ल्याचा कट

Updated: Apr 14, 2016, 02:53 PM IST
सावधान! आयसीस भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत title=

मुंबई : जगातील सर्वात मोठी दशहदवादी संघटना आयसीस हा भारतावर हल्ल्याचा कट रचत असल्याची माहिती समोर आली आहे. बांग्लादेश आणि पाकिस्तानमधून दहशदवाद्यांना पाठवून भारतावर हल्ल्याची योजना आखली आहे. 

पाकिस्तान, बांग्लादेशमध्ये ट्रेनिंग

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बांग्लादेशमध्ये पकडला गेलेला आयसीसचा दहशदवादी आमिर याने याबाबत खुलासा केला आहे. भारतावर हल्ला करण्यासाठी बांग्लादेश आणि पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग ही देत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. 

का करणार हल्ला ?

भारतात हिंदुमुळे मुस्लिमांना त्रास होत आहे. त्यामुळे हिंदुना मारण्यासाठी हा करणार असल्याची धक्कादायक माहिती याने दिली आहे.