'भारत माता की जय' म्हटलं नाही म्हणून तोडला हात!

'भारत माता की जय' म्हटलं नाही म्हणून दिल्लीत तीन मदरसा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. 

Updated: Mar 30, 2016, 06:13 PM IST
'भारत माता की जय' म्हटलं नाही म्हणून तोडला हात! title=
प्रातिनिधिक फोटो

नवी दिल्ली : 'भारत माता की जय' म्हटलं नाही म्हणून दिल्लीत तीन मदरसा विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलंय. 

मुस्लिम विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काही लोकांनी त्यांना नारे लगावण्यासाठी जबरदस्ती केली... आणि जेव्ही त्यांनी यासाठी नकार दिला तेव्हा त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. 

शनिवारी रात्री ही घटना घडलीय. दिल्लीतील बेगमपूर भागात तीन मदरसा विद्यार्थ्यांना काही लोकांनी घेरलं आणि 'भारत माता की जय'चे नारे लगावण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं. 

जेव्हा त्यांच्या धमक्यांना या विद्यार्थ्यांनी भीक घातली नाही तेव्हा काही गुंडांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत एका 18 वर्षीय विद्यार्थ्याचा हातही तोडण्यात आलाय. 

याप्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.