वहिनींना कधी घेऊन येणार?

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी मतदार संघात जोरदार धक्का बसला. राहुल गांधी लोकांनी गाडी अडवून विचारले, आमच्या वहिनींना सोबत घेऊन येणार? या प्रश्नानंतर राहुल यांचा गोंधळ उडाला.

PTI | Updated: Aug 21, 2015, 04:16 PM IST
वहिनींना कधी घेऊन येणार? title=

अमेठी : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी मतदार संघात जोरदार धक्का बसला. राहुल गांधी लोकांनी गाडी अडवून विचारले, आमच्या वहिनींना सोबत घेऊन येणार? या प्रश्नानंतर राहुल यांचा गोंधळ उडाला.

राहुल गांधी आपल्या अमेठी या मतदारसंघाचा दौरा करीत आहेत. दौऱ्यावर आलेले राहुल यांना अनपेक्षित प्रश्नाला सामोरे जावे लागले. वहिनींना सोबत घेऊन येणार? या प्रश्नाने काही क्षण तेही बुचकळ्यात पडले.

राहुल गांधी यांचा ताफा विश्रामगृहातून निघून ग्वॉल चौकात पोहोचताच लोकांनी त्यांना रोखले. सगळ्यांनी एकाच स्वरात, भय्या, कब तक अकेले आएगे, भाभी कब साथ आएगी? असा सवाल केला. यावर राहुल यांनी स्मितहास्य करत पुढे निघून गेले.

राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी अमेठी  येथे विनोबांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरून उतरून ते मुलांच्या दिशेने गेलेत. माझे नाव काय? अशी विचारणा करताच सर्वांनी राहुल गांधी, सांगितले. त्यानंतर ते हसले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.