शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि साहित्यिक माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Updated: Dec 19, 2014, 11:05 PM IST
शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि साहित्यिक माधवी सरदेसाय यांना साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतातील साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठीत साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. जयंत नारळीकर यांना 'चार नगरातले माझे विश्व' या आत्मचरीत्रासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

माधवी सरदेसाय यांना कोकणी भाषेतील मंथन या लेखसंग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. जयंत नारळीकर यांनी देखील पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या आधी माझ्या लेखनाला राज्यस्तरावर गौरवण्यात आले होते. आता राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार जाहीर झाल्याने आनंद झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.