महाराष्ट्रात 3 महिन्यात 21 हत्या केल्या, मात्र 36 वर्षांनी सापडला

ही धक्कादायक बातमी 36 वर्षानी समोर आली आहे. महाराष्ट्रात 21 जणांची निर्घुण हत्या केली, आणि 22 व्या हत्येनंतर तब्बल 36 वर्षांनी आरोपी हा बंगलोरमध्ये सापडला. 

Updated: Jul 3, 2014, 07:55 PM IST
महाराष्ट्रात 3 महिन्यात 21 हत्या केल्या, मात्र 36 वर्षांनी सापडला title=

बंगळुरू : ही धक्कादायक बातमी 36 वर्षानी समोर आली आहे. महाराष्ट्रात 21 जणांची निर्घुण हत्या केली, आणि 22 व्या हत्येनंतर तब्बल 36 वर्षांनी आरोपी हा बंगलोरमध्ये सापडला. 

मारेकऱ्याचं नाव चंद्रकात शर्मा असं आहे. चंद्रकांत हा 1985 पासून बंगळुरूमध्येच होता. 

चंद्रकांत यांची पत्नी हर्षा आणि मुलगा मोन्टो शर्मा या तीन जणांनी 2008 मध्ये आपल्या घरमालकाची हत्या केली. या हत्येप्रकऱणात बंगळुरू पोलिसांनी तीनही जणांना अटक केली.

 चंद्रकांत शर्माला अटक झाल्यानंतर जेलमध्ये चौकशीदरम्यान, चंद्रकांतने महाराष्ट्रातील आपल्या काळ्या कृत्यांचा पाढाच वाचला. 

एकट्या चंद्रकांतने  1978 ते 1981 या काळात जवळपास 21 खून पाडले. यानंतर 1985 मध्ये तो बंगळुरूमध्ये येऊन राहिला. महाराष्ट्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नसल्याने अखेर त्यांनी तपास बंद केला.
 
आता 22 व्या हत्येनंतर चंद्रकांत बंगळुरू पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. चंद्रकांतचा कबुली जबाब पडताळण्यासाठी बंगळुरू पोलिसांनी महाराष्ट्रात टीम पाठवण्याची तयारी केली आहे.
 
महासंचालक अलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांतच्या गुन्ह्यांच्या बहुतेक फाईल्स नष्ट झाल्या आहेत. मात्र इतक्या हत्या केल्यानंतर का होईना चंद्रकांत सापडला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.