संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सुरुवात

Updated: Mar 12, 2012, 12:46 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 

राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

 

संपूर्ण जगात आर्थिक आरिष्टात सापडलं आहे

 

तरीही सरकार ८ ते ९ टक्क्यांपर्यंत विकासाचा दर गाठेल

 

संसदेत लोकपालसमवेत अनेक महत्वाची विधेयक सादर

 

देशासमोर आव्हाने असताना देखील चांगला विकास दर गाठला आहे

 

काळ्या पैशा संदर्भात सरकारने योग्य पावलं उचलली आहेत.

 

कायद्यात सुधारणा घडवण्यासाठी राष्ट्रीय मिशनची स्थापना करणार

 

सरकार भ्रष्टाराचाराला रोखण्यासाठी कटीबध्द आहे

 

आधार योजनेचा फायदा सर्वांना होईल

 

कृषी विकास दराचं लक्ष्य चार टक्के इतकं निर्धारीत करण्यात आलं आहे

 

गरीबी आणि निरक्षरतेतं निर्मुलनासाठी सरकारने महत्वाची पावलं उचलली आहेत

 

आर्थिक सुरक्षिततेचं लक्ष्य हे सरकार समोरचं सर्वात मोठं आव्हान आहे

 

नॅशनल रुरल हेल्थ मिशनने प्रभावी कामगिरी केली आहे

 

देशातील एक कोटी महिलांना आरोग्य सेवेचा लाभ प्राप्त झाला आहे

 

पोलियोचं निर्मुलन ही सर्वात मोठी उपलब्धी असल्याचं राष्ट्रपती म्ह्णाल्या

 

शहरातील गरिबांनाही आरोग्य सेवेचा लाभ उपलब्ध करुन देणार

 

६० कोटी कुटुंबांना आरोग्य विम्याचा लाभ मिळवून देण्यात आला

 

जमीन अधिग्रहण विधेयक आणण्याचा सरकारचा प्रयत्न

 

बेघर लोकांना घर देण्याचं काम सरकार जोरात करत आहे

 

गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात आलं आहे

 

पर्यंटन उद्योगात १२ टक्के विकास दर गाठण्याचे लक्ष्य

 

जम्मू आणि काश्मिर तसंच इशान्य भारतात नवी रेडियो स्टेशन सुरु होणार

 

२० लाख लोकसंख्येच्या शहरांमध्ये मेट्रो रेल्वे प्रकल्प योजना राबवणार

 

अन्न सुरक्षा विधेयक संमत करण्यात आलं आहे

 

देशात महागाई कमी झाली आहे

 

गावात बँकिंग सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न

 

भारताच्या निर्यात व्यापारात वाढ झाली आहे

 

पेट्रोलियम पदार्थांच्या किंमत खाली आणण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु