पाकिस्तानला संपवा, शहीद जवानाच्या कुटुंबाचा आक्रोश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचा जवान मनदीप सिंग शहीद झाला.

Updated: Oct 29, 2016, 07:13 PM IST
पाकिस्तानला संपवा, शहीद जवानाच्या कुटुंबाचा आक्रोश  title=

कुरुक्षेत्र : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचा जवान मनदीप सिंग शहीद झाला. या जवानाच्या मृतदेहाची दहशतवाद्याकडून विटंबना करण्यात आली. मनदीप सिंग यांचं पार्थिव त्यांच्या गावी दाखल केल्यानंतर मनदीप सिंग यांच्या कुटुंबियांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसंच पाकिस्तानला संपवा अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.

एका मनदीपच्या बदल्यात पाकिस्तानची दहा डोकी घेऊन या असा आक्रोश मनदीप यांचे भाऊ संदीप सिंग यांनी व्यक्त केला आहे. तर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची प्रतिक्रिया मनदीपच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.

मनदीप यांचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. मनदीप यांची बायको प्रेरणा या कुरक्षेत्रमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. सहा महिन्यांपूर्वी मनदीप त्यांच्या घरी गेले होते. दिवाळीमध्येही पुन्हा ते घरी जाणार होते, पण सीमेवर वाढलेल्या तणावामुळे त्यांची सुट्टी रद्द करण्यात आली.