महिलेनं नवऱ्यासह सासरच्या सहा जणांना जिवंत जाळलं

वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेनं आपल्या सासरच्यामंडळींनी जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना तामिळाडूच्या मदुराई इथं घडलीय.

PTI | Updated: May 20, 2015, 06:09 PM IST
महिलेनं नवऱ्यासह सासरच्या सहा जणांना जिवंत जाळलं title=
पीटीआय फोटो

मदुराई, तामिळनाडू: वैवाहिक जीवनातील वादातून पांडेश्वरी या महिलेनं आपल्या सासरच्यामंडळींनी जीवंत जाळल्याची धक्कादायक घटना तामिळाडूच्या मदुराई इथं घडलीय.

या घटनेत पाच जणांचा जागीच तर एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. या घटनेनंतर पांडेश्वरी स्वत: सौदापेट्टी पोलिसांना शरण गेली. 

कन्नन आणि पांडेश्वीर यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आपसातील मतभेदांमुळं हे दांपत्य एक वर्ष वेगळे राहत होते. गावकऱ्यांच्या समजवण्यावरून कन्नन आपल्या मुळगावी चेन्नईहून परत येऊन आपल्या कुटुंबियांसोबत राहत होता. काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबियांसोबत राहायला आलेल्या कन्ननच्या घरी पांडेश्वरी आली आणि तिनं त्यांच्या घराचं दार बाहेरून बंद करत त्यावर रॉकेल ओतून पेटवून दिलं. 

या घटनेमध्ये कन्नन, त्याचे वडील वेलू (65 वर्ष) आणि आई पाचीम्मल (50 वर्ष), कन्ननची बहिणी सुगंधी (35 वर्ष), तिची मुलगी संगीता (17 वर्ष) आणि मुलगा संगीत (12 वर्ष) यांचा होरपळून मृत्यू झाला. तर, सुगंधीचाच तेरा वर्षाचा मुलगा विनीत याला शेजाऱ्यांनी उपचाराकरता सरकारी रुग्णालयात दाखल केलं असता त्याचा उपचारा दरम्यान मृ्त्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.